शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

जाळण्यासाठी लाकडं नाहीत म्हणून मृतदेहच वन कार्यालयात आणला; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:39 PM

विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकूड उपलब्ध नाही.शहरात पर्यायी सुविधा नाही.विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.अर्जुनी मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याचेवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. वन आगारातून लाकडे विकत घेऊनच प्रेत जाळली जातात. आप्तेष्टांनी वन कार्यालय गाठले. मात्र तिथे कित्येक महिन्यांपासून लाकडेच नाहीत. गावात लाकूड मिळण्याची दुसरी व्यवस्था नाही. आता प्रेताचे करायचे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चार चाकी वाहनांतून चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांचेशी चर्चा केली. त्यांनी आपल्या आगारात साठा नसल्याचे सांगितले.नवेगावबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला. १५ कि.मी.अंतरावर एखादे वाहन घेऊन जाणे सामान्यांना आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. मृतक हा अगदी सामान्य कुटुंबातला होता. दबाव वाढतच होता. ही बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी सुद्धा उपवनसंरक्षक युवराज यांना भ्रमणध्वनीवर कळविली. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक गोटेफोडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. इकडून-तिकडून प्रेत जाळण्यापूरते लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मृतकाच्या कुटुंबियांना लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आर.के.जांभुळकर, त्रिशरण शहारे यांनी प्रयत्न केले. या वेळी मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लांडे, अजय बडोले, रुपलाल बनकर, खुमदेव शहारे उपस्थित होते. अर्जुनी मोरगावच्या वन आगारात प्रेत जाळण्यासाठी लाकूड नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.मागणी नोंदविली आहेप्रेताच्या अंत्यविधीसाठी लाकूड ठेवले जाते. हा साठा संपलेला आहे. वन आगारात अजिबात लाकूड नाही. आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करू नये यासाठी आपल्या विभागाकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अजूनही लाकडे उपलब्ध झाली नाहीत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांनी दिली.

महामारीत लाकडांचा दुष्काळदेशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे. महामारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात ३२ जण बाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रेत जाळण्यासाठी वन आगारात लाकूड उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे गांभीर्याने घेत नाही. नवेगावबांधच्या आगारातून लाकूड आणणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही.तातडीने वन विभागाने उपाययोजना करावी अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आर.के.जांभुळकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग