शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

तिडकावासीयांना २२ वर्षांपासून मिळत नाही शुद्ध पाणी; गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 5:52 PM

Gondia : पाणीपुरवठा योजना नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथे गटग्रामपंचायत आहे. धाबेपवनीवरून ७ किमी अंतरावर गोठणगाव इटियाडोह धरणाच्या किनाऱ्यावर वसलेल्या तिडकावासीयांना अद्यापही जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळालेले नाही. परिणामी, गेल्या २२ वर्षांपासून येथील गावकरी शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. 

केंद्र शासनाने सन २०२४ पर्यंत देशातील संपूर्ण ग्रामीण व आदिवासी भागातील प्रत्येक कुटुंबाला 'घर तेथे नळ' देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 'जल जीवन मिशन' योजना २०१९ मध्ये सुरू केली. परंतु, सन २०२४ अर्ध्याहून अधिक संपले तरीसुद्धा आजही ग्रामीण भागात 'घर तेथे नळ' योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. तिडका हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव असून, लोकसंख्या ३६५ व १७० कुटुंबे आहेत. गावात जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. येथे सन २००३-०४ मध्ये पाणी टाकी व पाइपलाइन जोडणी करण्यात आली. पण, अद्यापही त्या पाणी टाकीतील पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. पाणी टाकी निकृष्ट दर्जाची तयार केल्याने ती केव्हाही कोसळू शकते. ही पाणी टाकी रस्त्यालगत असून, टाकीच्या तिन्ही बाजूंना घरे आहेत. पूर्व, दक्षिण दिशेला विद्युत तारांची लाइन असल्याने त्या विद्युत तारेवर पाण्याची टाकी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सन २०१३-१४ मध्ये तिडका येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन पाणी टाकी तयार करण्यात आली. पाइपलाइन टाकून नळ जोडणी करण्यात आली. पण, या पाणी टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने सन २०१५-१६ मध्ये पाणी सुरू करताच टाकीमधून पाणी गळणे सुरू झाले होते. ही समस्या अद्यापही मार्गी लावण्यात आली नसून गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्चकेंद्र शासनाने सन २०१९ ते २०२४ पर्यंत जल जीवन मिशन योजनेंतर्गत घर तेथे नळ योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जल जीवन मिशन योजनेंतर्गत 'हर घर नल, हर घर जल' ही योजना राबवित असताना सन २०२४ च्या मार्च, एप्रिल, मे महिन्यात लाखो रुपये मंजूर करून निकृष्ट बांधकाम केलेल्या सन २०१४-१५ च्या पाणी टाकीला दुरुस्ती करून रंगरंगोटी करून पुन्हा लाखो रुपये खर्च केले आहेत. तिडका येथील सरपंच कचलाम यांनी सांगितले की, सन २००३-०४ मध्ये तयार केलेल्या पाणी टाकीतून पाणी मिळालेच नाही. मात्र, कंत्राट- दाराला पुन्हा लाखोचे बिल मिळाले. येथील योजना गेल्या २२ वर्षापासून नाममात्र ठरत आहे.

"२००३ पासून तिडका येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना अजूनही कार्यान्वित झाली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. गेल्या २२ वर्षांपासून आदिवासी बांधव शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ही निंदनीय बाब आहे."- चंद्रकला ठवरे, पंचायत समिती सदस्य, झाशीनगर क्षेत्र 

टॅग्स :gondiya-acगोंदिया