शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

यंदा आंब्याला मुकली गावरान अमराई

By admin | Published: April 09, 2016 2:05 AM

जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात.

उत्पादनच नाही : आंब्यांच्या चवीपासून दुरावणार नागरिक, फळांचा राजा मिळणे कठीणबाराभाटी : जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात. पण त्या अमराईतील वृक्षांना आंबे लागल्याचे दिसतच नाही. त्यामुळे यंदा आंब्याविना अमराई पोरखी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.तांदूळ व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात डोंगराळ भाग आहे. हा भाग निसर्गाने नटलेला व पानाफुलांनी बहरलेला आहे. डोंगराळ भागात अनेक प्रकारची झाडे असून आयुर्वेदिक औषधी वनस्पतीसुद्धा आहेत. तसेच आम्रवृक्षसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यंदा फळांचा राजा आंबा दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे.यंदा सन २०१६ लागताच हवा, वादळवारा, पाऊस व गारपिटी यामुळे आम्रवृक्षांना येणारा बहर आधीच गळून पडला. हिरवी पालवीसुद्धा योग्यरीत्या फुटली नाही. पाने, फुले नाहीत तर फळ कुठून लागणार. हा प्रकार निसर्गाच्या कोपामुळे घडला. बऱ्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे आम्रबहर झडून गेला. त्यामुळे यंदा आंब्यांचे उत्पादन होणार नसून नागरिकांना चाखायलासुद्धा आंबे मिळणे कठिण झाले आहे. गावरान आंब्यांचे उत्पादन नसल्याने बाहेरील आंबे महागणार असून अधिक किंमत मोजून ते खरेदी करावे लागण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.गावरान अमराईचे दृश्य पाहिले तर किव येणाऱ्यासारखे चित्र दिसते. अमराई आंब्याविना पोरकी दिसते. तिचे सौंदर्यच हरवल्यागत झाले आहे. कोकिळेचा मधूर आवाज नाही, पक्ष्यांची किलबिल नाही, गर्द सावली दिसत नाही. रस्तासुद्धा मरमटला दिसतो. अमराईत खेळणारी मुलेसुद्धा दिसत नाही. अमराई सर्वांनिच मुकल्याचे वास्तव चित्र आहे. ही निसर्गाची किमया की कोप, असा सवाल अमराईचे मालक करतात. लोणच, पन्हा, आमरस, खुला हे सर्व यंदा मिळणार नाही. तर आंब्यांच्या घुया एकत्र करून, वाळवून, नंतर त्यांना विकून मिळणाऱ्या रोजगारावरही संक्रांत आली आहे. यंदा फळांच्या राजाच्या अभावाने अनेक समस्या उद्भवत आहेत. रोजगार, आमरसाची चव व विविध मिळणारे पदार्थ, हे मिळणार नाहीच. यावर्षी पळसफुले रोमांचकारी व आल्हाददायक वाटत होती तर आंबे मात्र बेपत्ता झाल्यासारखेच आहेत. उन्हाळा ऋतूत जो आनंद गावरान अमराईत मिळायचा, तो हरवला आहे. अमराईतील खेळही हरपले. अमराईच्या सावलीत फिरणारे-बाळगणारे मुले-मुलीसुद्धा यंदा आंबे नसल्याने दिसून येत नाही. अन्यथा सुट्टीमध्ये मामाच्या गावाला येणारी मुले ही अमराईतच खेळायची, आंबे खायची. तो काळ, ते दिवस यंदा गहाळ झाले आहेत. काळ जसजसा आधुनिक होत आहे तसतसा अमराईतील खेळही हद्दपार होत आहे.ग्रामीण भागात भर उन्हाचे चटके सहन करीत अमराईमध्ये फेरफटका मारत असताना असे चित्र यंदा साक्षात दिसून येत आहे. (वार्ताहर)