शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

तिरोडा पं.स.चा अजब कारभार

By admin | Published: June 07, 2017 12:18 AM

केंद्र शासनाची गरिबांना कामाची हमी देणारी रोजगार हमी योजनेच्या कामात मोठाच गलथान कारभार दिसून येत आहे.

काम न करताच मिळते मजुरी : रोजगार हमी, अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : केंद्र शासनाची गरिबांना कामाची हमी देणारी रोजगार हमी योजनेच्या कामात मोठाच गलथान कारभार दिसून येत आहे. तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या या कामात अनेक बोगस मजूर असून काम न करताच त्यांच्या खात्यावर मजुरी जमा केली जात आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये बुडत आहेत. महाराष्ट्र राज्यात कार्यरत जि.प. पंचायत विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, लघू जलसिंचन व इतर यंत्रणेंतर्गत ही कामे होतात. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे पंचायत समितीस्तरावरून नियोजन ग्रामपंचायत करते. यात पांदण रस्ते, माती काम, नाला सरळीकरण, शौचालय, गुरांचे गोठे, शेळीचे गोठे, सिमेंट रस्ते, कालवा दुरूस्ती, भातखाचर दुरूस्ती, शेततळे, विहिरी, घरकूल, क्रीडांगण दुरूस्ती अशी अनेक कामे केली जातात. पण या कामात पारदर्शकता न ठेवता जुन्या पद्धतीनुसार रोजगार हमीच्या कामावरील मजूर घरी बसून राहतो. तर काही ठिकाणी काम न करणारा माणूसही, वयाचे ६५ वर्षे पूर्ण झालेलाही हातात काठी घेवून कामाच्या ठिकाणी जावून बसून राहतो. मात्र मजुरीचा पैसा मजुराच्या खात्यात सरळ दिला जातो. ‘कामावर दाम’ ही पद्धत सर्वांना ठाऊक आहे, पण येथे वेगळीच पद्धत सुरू आहे. मस्टर आॅनलाईन काढले जाते, पण सर्व काम आॅफ लाईनच असते. मजुराला काम न करताच मजुरी दिली जाते. मस्टरवर हजेरी लावली जाते, असा प्रकार सुरू आहे. तिरोडा तालुक्यात रस्त्याचे काम व इतर कामे सुरू आहेत. त्यात रोजगार सेवकाची नेमणूक केली आहे. पण त्यांच्यामार्फत सर्व कामे अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही या धर्तीवर केली जातात. प्रत्येक मजुराकडून १०० ते १५० रूपये याप्रमाणे दर आठवड्यात घेतले जातात व १५० ते १९० रूपयांपर्यंत मजुरांना मजुरी काम न करता मोजमाप पुस्तिकेत दाखवून दिली जाते. प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकारी वर्गांनी कामाची तपासणी दोन समाजसेवक व पत्रकारांना घेवून केली तर संपूर्ण तालुक्यातील प्रकरणे समोर येवू शकतात. शासनाचे कोट्यवधी रूपये प्रत्यक्ष खर्च न करता रोहयो यंत्रणेचे कर्मचारी अर्धे आपल्या घशात घालतात. गोठे, शौचालय, नाला सरळीकरण, सिमेंट रस्त्याच्या कामात बोगस नावे दाखवून लाखो रूपयांची उचल कंत्राटदार, ग्रामसेवक, अभियंता, खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी करीत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. यात काही लोकप्रतिनिधीसुद्धा सहभागी आहेत. अशी गत तिरोडा पंचायत समितीची आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळी चमू घेवून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी केली वास्तव त्यांना कळू शकेल. त्यामुळे पुढे होणाऱ्या अशा घटणा टळू शकतील, रोहयो कायद्याची पायमल्ली केंद्र शासनाने रोहयो कायदा तयार केला. पण ‘अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही’च्या नादात या कायद्याची पायमल्ली झाली आहे. संपूर्ण पैसा वाया जात आहे. शेतकऱ्याची हमी न घेता, बांध दुरूस्ती न करता शेतकऱ्याच्या जमिनीवर कंत्राटदार, कृषी सहायक, कृषी अधिकारी यांच्याकडून साठगाठ करून काम केले जात आहे.