शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

शहरवासीयांना ‘होम क म्पोस्टींग’चे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:55 AM

घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवासीयांना याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान : नगर परिषदेने छेडली मोहीम, शहर होणार स्वच्छ सुंदर

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवासीयांना याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देणार आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्टार रँकींग व स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ अंतर्गत नगर परिषदेने यासाठी सोमवारपासून (दि.३) ही मोहिम सुरू केली आहे. सध्यास्थितीत घरात निघणारा कचरा मोकळ््या जागेत टाकून शहरवासी मोकळे होत आहेत. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार दिसून येतात. शहरात सर्वत्र विखुरलेल्या कचºयामुळे शहराचे सौंदर्य लोप पावत आहे. तर या कचऱ्यामुळे वातारवणही प्रदूषीत होत आहे. परिणामी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात निघणाºया कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावणेही नगर परिषदेसाठी जिकरीचे काम आहे. नेमकी हीच बाब हेरून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नव्याने आलेल्या स्टार रँकींग व स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत ‘होम कम्पोस्टींग’ हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यांतर्गत, शहरवासीयांना त्यांच्या घरातील कचऱ्यावर घरातच प्रक्रिया करावयाची आहे. नगराध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याधिकारी चंदन पाटील व प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या उपक्रमांतर्गत सोमवारपासून (दि.३) मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन १५-२० जणांच्या गटाला याबाबत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देत आहेत. सोमवारी (दि.३) शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील गौतमनगर परिसरात नगरसेविका वर्षा खरोले व नगरसेवक विजय रगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता विभागातील अभियंता देवेंद्र वाघाये, आरोग्य निरीक्षक मुकेश शेंद्रे, मनिष बैरिसाल, प्रफुल पानतवने, सुमीत शेंद्रे यांनी हा ‘होम कम्पोस्टींग’चा प्रयोग नागरिकांना प्रात्यक्षिकातून करून दाखविला.अशी आहे ‘होम कम्पोस्टींग’ची प्रक्रियायांतर्गत दोन मडके घेवून त्यांना छिद्र करायचे असून त्यात घरातील भाजीपाला, झाडांची पाने अशा प्रकारचा ओला तसेच सुका कचरा टाकायचा आहे. या कचऱ्याला मिसळून झाकून ठेवायचे. दररोज हाच प्रकार केल्यास सुमारे १५-२० दिवसांत हे मडके भरल्यानंतर त्याला बंद करून ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या मडक्यात कचरा टाकून हाच विधी करायचा. अशात सुमारे १५-२० दिवसांत मडक्यांत खत तयार होत असून ते घरातील झाडांसाठी किंवा अन्यत्र वापरता येणार.या उपक्रमामुळे शहराचे वातावरण निरोगी राहणार असून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहणार. यासाठी शहरवासीयांच्या सहकार्याची गरज आहे.-अशोक इंगळे,नगराध्यक्ष.........................शहरातील कचऱ्याची समस्या आता मार्गी लागणार असून शहर स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. शहरवासीयांनी सहकार्य केल्यास शहर कचरामुक्त व सुंदर होईल.- चंदन पाटील,मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान