शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

शेतकरी व बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न

By admin | Published: February 08, 2017 1:12 AM

पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून

तिरोडा : पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून शेतकरी व बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा फसव्या लोकांपासून व प्रचारापासून सावध राहा, असे आवाहन पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी दादासाहेब फुंडे यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पतंजली किसान सेवा समितीची बैठक पार पडली. त्यात जवळपास ४० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.फुंडे पुढे म्हणाले, पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे नागपूर जिल्ह्यातील मिहान येथे पतंजली मेगा फूड पार्क प्रकल्प उभारला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त व जैविक उत्पादनांची मागणी वाढणार आहे. सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच संधीचा लाभ काही संधीसाधूंनी उचलण्याचा सपाटा ग्रामीण भागात सुरू केला आहे. स्वदेशीच्या नावावर स्थापित अनेक संस्थांच्या नावांचा उपयोग करीत पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाला, आमच्याद्वारेच ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार व बेरोजगारांना रोजगार देणार अशी बतावणी करून शेतकरी व बेरोजगार यांची दिशाभूल केली जात आहे. हे भामटे शेतकऱ्यांची शेतजमीन एकरी ५० हजार रूपयेप्रमाणे वर्षाच्या करारपट्टीवर घेण्याचे आमिष दाखवितात. त्यासाठी नोंदणी शुल्क सहा हजार रूपये तर बेरोजगारांना या प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार रूपये प्रक्रिया शुल्क वसूल करून बायोडाटा स्वीकारत असल्याचे उघडकीस येत आहे. अशा फसव्या लोकांपासून सावध रहा, असे आवाहन करीत ते म्हणाले, पतंजलीच्या कार्यपद्धतीनुसार मिहान येथील फूडपार्कला लागणारा शेतमाल पतंजली थेट शेतकऱ्यांजवळून विकत घेणार आहे. त्यात कोणताही दलाल मध्ये राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी नागेश गौतम, लक्ष्मी आंबेडारे, पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.