शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

जलयुक्त योजनेच्या मातीबांध कामात गैरप्रकार

By admin | Published: June 24, 2017 1:51 AM

तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे.

तालुका कृषी विभागाचा अजब कारभार : राजस्थानी ट्रॅक्टरने केले रात्रीला काम लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे. यावर शासन कोट्यवधींचा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. पण एकीकडे ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’च्या नावावर शेतकऱ्याला अडवा अन् पैसे जिरवा, असा गैरप्रकार कृषी अधिकारी कार्यालयातून सुरू आहे. करटी बु. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर मातीकाम सदर कार्यालयामार्फत करण्यात आले. पण शेतकऱ्यांना याची जाणीवच नाही. कृषी सहायिका हरिणखेडे यांनी शेतकऱ्यांची सहमती व सातबार न घेता अल्प प्रमाणात मातीचे काम ट्रॅक्टरने केले व शेतकऱ्यांच्या धानपिकांच्या समतोल बांध उलट खराब केले. त्यामुळे बांधीत समतोल पाणी न राहता एकाच बाजूने राहील. तर काही ठिकाणी माती घालण्यात आलेच नाही. ऐन शेतीच्या कामात व पीक घालणे सुरू असतानाच शेतकऱ्यांची शेती खराब झालेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक हरिणखेडे यांना विचारले असता त्यांनी उलट शब्दात उत्तरे दिली. शासनाच्या नियमाने कामे करू, अधिकारी जसे सांगतील तसे करू, मी महिला कर्मचारी आहे, अशा शब्दात शेतकरी सुरेश पटले यांना उत्तर दिले. तर शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न समोर आहे. संपूर्ण काम अल्प प्रमाणात करण्यात आले आहे. काही ठिकाणी बांध जसेच्या तसेच आहेत. जीर्ण धुऱ्यांच्या बांधीवर माती घातले, पण चांल्या धुऱ्यांवर माती न टाकता उलट माती बांधीतच टाकण्यात आली आहे. एका एकराला एका तासात चारही बाजूंनी ट्रॅक्टरने खोदून माती कसीतरी टाकण्यात आली. आजही माती बांधीत आहे. यात फक्त ७५० रूपयांत एक माती काम झाले आहे. तर शासन एका एकराला ३५ ते ४५ हजार रूपये देते. यात हिशेब लावला तर कोट्यवधी रूपयांचा माती बांध कामात गैरप्रकार झाला असावा, असे बोलले जात आहे. शेकडो हेक्टरमध्ये मातीकाम सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारे काम या विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी स्वत: करावी. कृषी सहायक मुख्यालयी राहत नाही. तिरोडा येथून कार्यभार चालवित आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा सेवा सहकारी संस्थेचे सदस्य सुरेश पटले, विनय पटले, अंजीलाल पटले, यशवंत लांजेवार, धनपाल पटले, मुकेश अंबुले, छगन बघेले, शिवशंकर बघेले, विवेक कटरे, महेश पटले, नंदकिशोर ठाकरे, गोरेलाल कटरे, विजय पटले यांनी केली आहे. तशी तक्रारही जिल्हाधिकारी, कृषी विभाग व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.