शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत आहे. ...

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत आहे. तर जमिनीची सुपीकतासुद्धा खालावत चालली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास उत्पादन वाढीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी.पी. खंडाईत यांनी केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र चामट हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिराकुमार गोमासे, छाया पटले, सुनीता वाळूलकर, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, उमेश सोनेवाने, जी. के. चौधरी, एल.के. रहांगडाले, एस.जी. चव्हाण उपस्थित होते. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा समतोल वापर, गांडूळ खत, हिरवळीचे खत, ॲझोला, जीवामृत, सेंद्रिय खते यांचा वापर करणे तसेच युरिया ब्रिकेट्सचा वापर यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन एल. के. रहांगडाले केसालवाडा यांनी केले, तर आभार घनश्याम चौधरी यांनी मानले.