शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

चढत चाललाय जिल्ह्यात लसीकरणाचा ग्राफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:29 AM

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हादरा दिल्याने यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी शासन आता लसीकरणावर जोर देत ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हादरा दिल्याने यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी शासन आता लसीकरणावर जोर देत आहे. यासाठीच आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. यामुळेच सोमवारपर्यंतची आकडेवारी बघता जिल्ह्यात २२८०७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित असल्याने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे.

मागील वर्षी कोरोनाने चांगलाच कहर केला होता. मात्र, तेव्हा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी औषध हाती नसल्याने कोरोनाला आपली मनमर्जी करता आली होती. मात्र, भारतातच तयार दोन लस कोरोनाला मात देण्यासाठी तत्पर असल्याने १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लढा सुरू झाला आहे. मात्र, नागरिकांकडून या लसींना घेऊन मनात भीती व संभ्रम निर्माण झाल्याने लसीकरणाला पात्र असूनही कित्येक नागरिक भीतीपोटी लस घेत नसल्याचेही तेवढेच सत्य आहे. हेच कारण आहे की, अपेक्षेच्या तुलनेत कमी प्रमाणात लसीकरण झाले. नेमका हाच डाव हेरून कोरोनाने आपल्या दुसऱ्या लाटेत कहर केला.

आता मात्र कोरोनाला घालवण्यासाठी व पुढे अशी संधी मिळू नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त लसीकरण हाच पर्याय असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार शासनाकडून आता लसीकरणावर जोर दिला जात असून, जिल्ह्यातही त्यादृष्टीने केंद्रे वाढवून व शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी धडपड सुरू आहे. यातूनच आतापर्यंत २२८०७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शिवाय, आता शहरी भागात नागरिक लसीकरणासाठी स्वत: पुढे येत असल्याचे चांगले चित्रही दिसून येत आहे.

-----------------------------------

ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद

कोरोना लसीबाबत आजही कित्येक नागरिकांत भीती व संभ्रम आहे. यामुळेच ते लस घेणे टाळत असून लस घेतल्याने भलतेच काही होत आहे, असा त्यांचा समज झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात लसीकरण कमी होत आहे. मात्र, लस सुरक्षित असल्याने सर्वांनीच घ्यावी, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

---------------

५० हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस

जिल्ह्यात आतापर्यंत २२८०७५ नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. यात १७७७४६ नागरिकांचा पहिला डोस झाला असून ५०३२९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये १५१०१७ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला आहे, तर ७७०५८ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे.