शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

पथदिवे बंद असल्याने गाव रात्रीला अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:33 AM

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी ...

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी आता रात्रीला गाव अंधारात राहत असून गावकऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात आता विषारी कीटकांचा धोका वाढला असून ग्रामपंचायतने व शासनाने त्वरित तोडगा काढून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

पूर्वी पथदिव्यांचा वीजबिल भरणा जिल्हा परिषद करीत होती. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणाऱ्या विविध कर व विकास निधीतून वीज वितरण कंपनीला वीजबिलाची रक्कम वळती करण्याबाबतचा निर्णय अलीकडेच घेतला होता. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचे थकीत आणि बंदीत अनुदानातून पाणीपुरवठ्याचे वीजबिल ग्रामपंचायतने भरावे, असे शासनाने आदेशित केले होते. परंतु असे केल्यास ग्रामपंचायत अंतर्गत इतर विकासकामांना निधी उरणार नसून गावातील विकासकामांवर निधी खर्च करता येणार नाही, असे जिल्हा सरपंच सेवा संघाचे म्हणणे आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मोलमजुरी नाही, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, रोजंदारी मजूर व छोटे-मोठे व्यापारी या सर्वांचेच आर्थिक हाल झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतकडे येणारे विविध प्रकारचे कर नागरिकांनी भरले नसून ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून गावात भुरट्या चोऱ्यादेखील झाल्या आहेत व गावात अंधार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन पथदिवे त्वरित सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

--------------------------------

वीजबिल शासनाने भरावे

नवेगावबांध ग्रामपंचायतकडे १२ बिलांचे ४१ लाख १२ हजार ९५४ रुपये थकीत आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीकडून १७ जून रोजी ग्रामपंचायतला बिल भरण्यासाठी नोटीस देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने पथदिव्यांची जोडणी कापली. गावातील वीजबिलांचा भरणा झाल्याने वीज जोडणी कापण्याचे प्रकार राज्यातच घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने वीजबिल भरावे व यासाठी आमदारांनी राज्य सरकारकडे हा प्रश्न लावून धरणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.