शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

टोमॅटो लावून चूक झाली? मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने पडली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:05 IST

वाहतुकीचा खर्चसुद्धा निधेना : गोंदियात आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरण्यास सुरुवात झाली. आता तर दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो विकले जात आहेत. शेतकऱ्याचा लावणीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा होण्यास सुरुवात झाली असल्याने भाजीपाला पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढत चालले आहे.

जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला व नागपूर येथील मुख्य बाजारपेठेतून येणारा भाजीपाला यामुळे भाजीपाल्याची आवक वाढून टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे दर प्रचंड प्रमाणात घटले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ४० रुपये पाव दराने विकल्या जाणारा सांभार, मेथी, पालक आता १० रुपयांना एक पावाची जुडी विकली जात आहे. टोमॅटो तर दहा रुपयांना किलोभर किंवा सायंकाळी दहा रुपयांना दीड किलो दिले जात आहेत. घरी परत नेण्यापेक्षा मिळेल त्या भावाला टोमॅटोची विक्री केली जात आहे. शेवटी असलेले कमी दर्जाचे टोमॅटो त्या ठिकाणी ठेवून शेतकरी गावाला निघून जात आहेत. दुसऱ्या दिवशी याच टोमॅटोवर मोकाट जनावरे ताव मारत असल्याचे चित्र दिसून येते. भाव वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरीवर्ग उराशी बाळगून आहेत. 

१०० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड१०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन झाल्याने भाव कमी झाले आहेत.

तोडणी, वाहतुकीचे वांदे!ग्रामीण भागात मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणीसाठी शेतकऱ्यांना अडचण जात आहे.

१० रुपये दीड किलो दराने बाजारात विकतोय टमाटरआठवडी बाजारात सायंकाळच्या सुमारास १० रुपयांना दीड किलो एवढ्या कमी दराने टोमॅटो विकले जात आहेत. भाव कमी असल्याने व्यापारीवर्गालाही यातून अतिशय कमी प्रमाणात नफा मिळत आहे. त्यामुळे ते विक्रीस फारसे तयार नाहीत.

उत्पादन वाढले, मात्र कवडीमोल भावाने विक्रीटोमॅटोसह इतर पालेभाज्यांचे दर अतिशय कमी झाले आहेत. दारात दहा रुपयांचा भाव ग्राहकांच्या दारात केवळ १० रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. शेतकरी २० ते ३० किमी अंतरावरून दुचाकीने टोमॅटो आणतात. त्यांचा वाहतूक खर्चसुद्धा निघत नसल्याचे दिसून येत आहे. टमाटरचे उत्पादन मोठा पैसा कमवून देईल अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकाच वेळी ही लागवड केल्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा अधिक असल्यामुळे कवडीमोल भावाने विक्री होत आहे.

भाव कशामुळे आपटला ?फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोचे प्रचंड प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव आपटला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली असल्याचे दिसून येत आहे.

वैशाली वाणाची लागवड, मागणी जास्तटोमॅटोच्या अनेक संकरीत जाती आहेत. त्यापैकी टोमॅटोची लागवड सर्वाधिक केली जाते. या वाणाचे टोमॅटो ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. या टोमॅटोची वरची साल जाड राहत असल्याने ते जास्त दिवस टिकून राहते, तसेच वाहतुकीदरम्यान, सदर टोमॅटो अतिशय कमी प्रमाणात फुटतात. त्यामुळे या टोमॅटोची लागवड वाढली आहे.

टोमॅटो ८० ला टच झाला होता!ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोचे भाव ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. टोमॅटो स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे कितीही दर असला तरी टोमॅटोची खरेदी करावीच लागते. परिणामी बजेट वाढते.

"ठोक स्वरूपात कमी दरात टोमॅटो उपलब्ध होत असल्याने कमी दरानेच विकल्या जात आहेत."- प्रेमानंद पाथोडे, भाजीपाला विक्रेता

"टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चांगला भाव मिळून नफा मिळेल, अशी अपेक्षा होती. भाव गळगळले असल्याने काहीच नफा मिळत नाही."- संजय देशकर, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :gondiya-acगोंदिया