शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

आमगावात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:25 AM

शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती : उपाय योजनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने आमगाव येथे जलसंकट निर्माण झाले आहे.आमगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली. २.५० लक्ष पाणी टाकीचे व जलवाहिनीचे नविनीकरण करण्यात आले. यात माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी या योजनेला गती दिली. या योजनेत वाढीव पाणी पुरवठा व पाणी टाकीची क्षमतेप्रमाणे वाढ करणे अपेक्षित होते.मात्र त्यासाठी प्रशासनाने कमी प्रमाणात निधी दिल्याने पाणी टाकीच्या क्षमतेत वाढ करणे शक्य झाले नाही.शहराच्या वाढत्या लोकसंख्येला या योजनेव्दारा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहे. त्याचाच परिणाम पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. या पाणी टाकीची क्षमता अडीच लाख लिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यात केवळ १ लाख ५० हजार लिटर पाणी साठविले जात आहे. तर मागील बऱ्याच कालावधीपासून पाणी टाकीची साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोन मोटारपंप लावले असून ते देखील अपूरे पडत आहे.यासर्व गोष्टींमुळे आमगाववासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमगावला पाणी पुरवठा होणाऱ्या बाघ नदीचे पात्र देखील कोरडे पडल्याने मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीय पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित असल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.भविष्यकालीन उपाय योजनांचा अभावशहरातील वाढती लोकसंख्या लक्षात पाणी पुरवठ्यासह इतर उपाययोजनात वाढ करणे आवश्यक आहे. दरवर्षी आमगाव शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावरुन नागरिकांची ओरड होते. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी पायपीट करतात. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजसेविका ज्योती खोटेले यांनी सांगितले.