शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

आम्हाला सौर ऊर्जा पंप नको, वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:26 AM

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला की झाला या आविर्भावात खासगी कंपन्या वावरत आहेत. पंप बिघाडाची दुरुस्ती करून देण्याचे सौजन्य बाळगले जात नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारीसुद्धा सांगून थकलेत मात्र उपयोग होत नाही. यामुळे सीआरआय व मुंदरा या कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांत अधिक आक्रोश दिसून येत आहे.

निमगाव येथील नारायण खोब्रागडे यांची सिल्ली (निमगाव) येथे गट क्रमांक- ३१० मध्ये शेतजमीन आहे. त्यांचा १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यांनी मागणी पत्राप्रमाणे ८,२९० रुपये भरणा केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीचा ३ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला. सौर ऊर्जा पंप बसविला त्याच दिवशी मोटार बंद झाली. कंपनीने ४ दिवसांनी दुसरी मोटार बसवून दिली. एक महिन्यानंतर ती पुन्हा बंद पडली. तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करून दिली. परत ३ सप्टेंबर २०२० पासून मोटार बंद आहे. या शेतकऱ्याने अर्जुनी-मोरगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली व स्मरणपत्र दिले. तसेच ऑनलाईन तक्रार केली. मात्र अद्यापही सौर ऊर्जा पंप दुरुस्त करून देण्यात आले नाही.

पंप नादुरुस्त असल्यामुळे खोब्रागडे यांचे खरीप हंगामात पाण्याअभावी शेतपिकाचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर त्यांना रब्बी हंगामाला मुकावे लागले. बोळदे-करडगाव येथील जगदीश सांगोळे या शेतकऱ्याने ३० मे २०१९ रोजी मागणीपत्रानुसार पैसे भरले. मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीने सौर ऊर्जा पंप बसवून दिला. आठवडा होत नाही तोच पंपात बिघाड आला. दोनदा तो दुरुस्त करून दिला मात्र पुन्हा बिघाड आला. सांगोळे यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. गेल्या ६ महिन्यांपासून पंप बंदच आहे. ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली मात्र काहीच उपयोग झाला नाही. प्रमिला जांभुळकर व लोथे या शेतकऱ्यांनाही मुंदरा कंपनीचे वाईट अनुभव आलेत.

शेतकऱ्यांच्या नावावर कंपन्यांचंच चांगभलं होत असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. मुळात ही योजनाच फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. सौर ऊर्जा पंप कंपनीने तातडीने दुरुस्ती करून द्यावे. नाही तर वीज वितरण कंपनीने शेतात नवीन वीज मीटर बसवून द्यावे जेणेकरून शेतीला सिंचन होईल, अन्यथा नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.