शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
3
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
4
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
5
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
6
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
7
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
8
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
9
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू
10
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
11
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
12
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
13
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
14
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
15
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
16
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
17
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
18
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
19
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
20
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही

आणखी आठवडाभर करावी लागणार पाण्यासाठी प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:53 PM

ढिसाळ नियोजनामुळे वारंवार खंड : एक कोटी रुपयांची पाणीपट्टीही थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बनगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या नलिकेत बाम्हणी रेल्वे चौकीजवळ गळती झाली आहे. या गळतीमुळे १५ ऑक्टोबरपासूनच पाणी पुरवठा बंद आहे. या कामाला आणखी आठवडा लागणार असल्याची माहिती संबंधीत विभागाने दिली आहे. यामुळे आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना आणखी आठवडाभर पाणी मिळणार नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांवर पाणीपट्टीचे एक कोटी रुपये थकीत आहेत. १७ ऑक्टोबर रोजी आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तब्बल २३ लाख रुपये जमा केले आहे. मोदी सरकार एकीकडे 'घर घर नल, हर घर जल' असे म्हणत आहे. परंतु भाजपची सत्ता असलेली जिल्हा परिषद या योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता नागरिक त्रस्त झाले आहेत. 

कधी वीज पुरवठा खंडित, कधी पाईपलाईनला गळती, कधी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाहीत. परिणामी ३६ गावांवर एक कोटी रुपये थकीत आहेत. 

योजना बंद झाल्याचीच माहिती अधिकारी देतात योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी या योजनेचे पाणी वापरणाऱ्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना बनगाव पाणी पुरवठा या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडून त्यांच्यात सतत जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु योजनेच्या बिलाची थकीत आकडेवारी पुढे येत नाही. योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला की माहिती देण्यात येते. ही योजना चालविणारे अधिकारी उदासीन आहेत.

आठवडाभरापासून पाणी मिळेना, नागरिक पडले आजारी या योजनेतून मिळणारे पाणी शुद्ध होते. परंतु ते पाणी मिळणे बंद झाल्याने आता नागरिक गरजेसाठी दूरवरून विहीर, बोअरवेल, डबके येथील पाणी वापरत आहेत. त्यामुळे आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील लोकांना विविध आजार जडले आहे. याकडे जि.प.ने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

वेळेवर बिलच देत नसल्याने होत नाही वसुली पाणी पुरवठ्याचे बिल वेळेवर नगर परिषद व ग्रामपंचायतींना देत नसल्यामुळे थकीत पैसे ग्रामपं- चायत भरत नाही. नगर परिषदेला बिलच पोहचत नसल्यामुळे पैसे किती आणि केव्हा भरायचे, हे कर्मचाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे ही योजना राबविणाऱ्या योजनेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया