शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:28 AM

गोंदिया : मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ...

गोंदिया : मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर राज्य शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा सूर आवळला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३० हजार २३० शेतकरी पात्र ठरणार आहेत. शासनाने घोषणा करून वर्षभराचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्षात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत. एवढेच नव्हे, तर प्रोत्साहनपर अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा झाले का याची विचारपूस करण्यासाठी बरेच शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या पावलीच निराश होऊन परत जावे लागत आहे. प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केव्हा जमा होणार याची माहिती संबंधित विभाग आणि बँकांनासुद्धा नसल्याची बाब पुढे आली.

............

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

मी जिल्हा बँकेत ७५ हजार रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. त्याची मुदतीत परतफेडसुद्धा केली. मागील दोन-तीन वर्षांपासून मी नियमित पीक कर्जाची परतफेड करीत आहे; पण शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ अद्यापही मला मिळाला नाही.

- रामदास नागपुरे, शेतकरी

............

दरवर्षी खरीप हंगामाकरिता मी जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करतो. त्याची नियमित परतफेड करतो. मागील राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते; पण अनुदानाची रक्कम अजूनही बँक खात्यात जमा झाली नाही.

- दिलीपसिंह गहरवार, शेतकरी

.....................

४२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यासाठी जिल्ह्यातील ५२ हजारांवर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ४२ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.

...........

कोट

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती; पण यासंदर्भातील कुठल्याही सूचना बँक अथवा सहकार विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत.

- बँक व्यवस्थापक.

...........

घोषणा झाली, मात्र अद्यापही जीआर नाही

राज्य शासनाने मागील वर्षी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटूनही यासंदर्भातील जीआर निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

.............

कर्ज वेळेवर फेडणारे शेतकरी

३०२३०

प्रोत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी

००