शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

गोंदिया-बल्लारशा मार्गावर एक धावतेय, दुसरी केव्हा धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 17:13 IST

गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल एकच पॅसेंजर सुरू असल्याने अनेकांची अडचण

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भाव बंद केलेल्या पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाही. रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वी गोंदिया-बल्लारशा मार्गावर दोन्ही ठिकाणाहून प्रत्येकी एकच पॅसेंजर गाडी सुरू केली आहे. एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांना कुठलाच उपयोग होत नसून उलट त्यांचा मनस्ताप वाढत आहे. त्यामुळे एक तर धावतेय दुसरी पॅसेंजर गाडी केव्हा सुरू करणार असा सवाल या मार्गावरील प्रवाशांनी केला आहे.

गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सकाळची लोकल सुटल्यास दुसऱ्या दिवशीच जाण्याशिवाय पर्याय नाही. गोंदियासह सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची भिस्त या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्यांवर आहे.

गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, डव्वा, सटवा, पुरगाव, चिचगाव, गोरेगाव, या गावासह सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी, गोंगले, डव्वा, घोटी, खोडशिवनी, मालीजुंगा, सौंदड, गोंडउमरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, बाराभाटी, अरुणनगर, पिंपळगाव, झरपडा या गावातील नागरिकांना जिल्हा तर गोंदियाकडे येणारी रेल्वेगाडी रात्री ८ वाजता गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर पोहोचत आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाश्याला या मार्गावरील एखाद्या गावी जायचे झाल्यास परत येताना थेट रात्रीची रेल्वेगाडीच एकमात्र पर्याय आहे. मुख्यालय अथवा शेजारच्या जिल्ह्यातील वडसा येथील बाजारपेठे ये-जा करण्यासाठी या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्या सोयीच्या ठरतात, पण केवळ एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

'या' मार्गावर पॅसेंजर का नाही?

रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी गोंदिया-बालाघाट-कटंगी मार्गावर पूर्वीसारख्या फेऱ्या सुरू केल्या; पण गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील फेऱ्या सुरू केल्या नाही. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग या मार्गावरील पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्यास नेमकी अडचण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एक्स्प्रेसचा थांबाही बंद

या मार्गावर चालणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा गोदियावरून सौंदड, अर्जुनी मोरगाव, नागभीड, मूल, चंद्रपूर या स्थानकावर देण्यात आला होता; पण सर्व सुपरफास्ट गाड्या सुरू असूनसुद्धा या स्थानकावर गाड्यांचे थांबे बंद आहे. परिणामी प्रवाशांना याचा कुठलाच लाभ होत नाही.

टॅग्स :railwayरेल्वेPublic Transportसार्वजनिक वाहतूकpassengerप्रवासी