शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 4:07 AM

गोंदिया : खोटे बोलून ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यांनीच डिझेल महाग केल्याने शेतकऱ्यांच्या ...

गोंदिया : खोटे बोलून ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यांनीच डिझेल महाग केल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च दुपटीने वाढलेला आहे. पेट्रोल, खाद्यतेल महाग झाल्याने सामान्य जनतेला महागाईचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देणे, रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देणे व शेतमजूर वर्गाच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे. या सर्व गोष्टींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस भवन येथे आयोजित तालुक्यातील पांढराबोडी, नागरा, बिरसोला व काटी जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, गणेश बरडे, जितेश टेंभरे, मोहन पटले, गोविंद तुरकर, चंदन गजभिये, सुनील पटले, शैलेश वासनिक, रजनी गौतम, उषा मेश्राम, धनंजय गुप्ता, वर्षा पंधरे, सतीश कोल्हे, डाॅ. रुपलाला चिखलोंढे, तेजलाल येडे, नानू मूदलीयार, राजेश नागपुरे, खोमेंद्र कटरे, गुलाब नागदिवे, अश्विन ढोमणे उपस्थित होते. खासदार पटेल यांनी केलेल्या विकास कामाचा प्रसार-प्रचार करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे सांगितले. प्रत्येक बूथवर किती लोकसंख्या आहे याचा विचार करून प्रत्येक माणसाला जोडण्याचे काम करावे असे सांगितले. याप्रसंगी मलीन कुरेशी, लोकेश जगने, नजीम शेख, राज बोपचे, अभय गोले, इमरान शेख व अन्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.