शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

आमगावला येत आहात.. मग जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व   रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने   या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्याने जाणे-येणे म्हणजे तारेवरची जणू कसरतच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यातच प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

नरेंद्र कावळेलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया’द्वारा आमगाव ते गोंदिया रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. आमगाव ते गोंदिया दरम्यान किमान २५ किलोमीटर रस्ता म्हणजे ‘मरायला सस्ता’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने ‘गोंदियावरून आमगावला येत आहे का मग जरा जपून’ असे वाक्य प्रत्येक माणसांच्या तोंडातून निघत आहेत .  आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व   रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने   या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्याने जाणे-येणे म्हणजे तारेवरची जणू कसरतच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यातच प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.  पुण्यातील एका कंपनीमार्फत या रस्त्याचे काम सुरू असून संपूर्ण रस्ता उखडला आहे. एक बाजूला खोदकाम करून दुसरी बाजूसुद्धा ठेकेदाराने जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित ठेवली नाही.....या रस्त्याच्या दुर्दशेमुळे राज्य परिवहन महामंडळाने या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्यादेखील कमी करून टाकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहने अपघातग्रस्त झालेली दिसून येतात. त्यातच दुचाकीचालकांना मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जात आहेत. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष दिसत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याची तपासणी करतानासुद्धा दिसून येत नाही.  रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धूळ उडू नये याकरिता  रस्त्यावर पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळेही वाहन स्लिप होऊन अपघात होत आहे. कंपनीमार्फत कुठेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. कंपनीने नियोजनबद्ध  पद्धतीने रस्त्याचे लवकरात बांधकाम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

गोरेगाव मार्गाने ये-जा- आमगाव-गोंदिया मार्गाची दुर्दशा व त्यामुळे होणारा त्रास बघता देवरीवरून गोंदियाकडे येणारे तसेच गोंदियाहून देवरीकडे जाणारे आमगाव मार्ग सोडून गोरेगाव मार्गाने जाणे पसंत करीत आहेत. यामध्ये त्यांना फेरा मारावा लागत असून तेवढाच इंधनखर्च वाढत आहे. मात्र त्रास करून घेण्यापेक्षा फेरा मारणे जास्त सोयीचे ठरत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग