शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

उपचारादरम्यान १० महिन्याच्या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप : गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा

By admin | Published: December 03, 2015 12:35 AM

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मगन गोमाभाऊ भोई, रा. जिजाऊनगर यांनी आपली भाची मंगला अशोक भोई (रा. विटा, जि. पुणे) हिला दिवाळीसाठी आपल्या घरी आणले होते. तिचा मुलगा प्रवीण (१० महिने) या बालकास सर्दी झाल्याने त्याला बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता या बालकाचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणाचा आरोप
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला असून याबाबत त्यांनी सांगितले की, मुलाला केवळ सर्दी असल्याने त्याला उपचारासाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी मात्र त्याला दाखल करावे लागेल असे सांगून दोन हजार रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) घेऊन बालकाला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान बालकाला औषध दिले व त्याला उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत चुकीचे उपचार केल्याने तसेच येथील नर्सेस स्टाफच्याही दुर्लक्षामुळे या बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप मगन भोई यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून चौकशी
रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची चौकशी केली.
शवविच्छेदनानंतर होणार कारण स्पष्ट
या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.