शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 2:44 PM

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं.

मुंबई - भारतात अचानक गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचं कळतंय. सध्या गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. 

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं. या केंद्रीय पथकात नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्याचं नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव करत आहेत. TOI रिपोर्टनुसार, गोवर हा संसर्गजन्य रोग असून कमी काळात त्याचे २९ हून अधिक रुग्ण आढळले. 

अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. ज्यात काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटलं की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे. 

काय आहेत गोवरची लक्षणे?सीडीसीनुसार, गोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर २-३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत.