शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Alert : वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 12:22 PM

अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कळकळाट आलाच. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात.

-Ravindra Moreअवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कळकळाट आलाच. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. या काळात सतर्क राहण्याचे आवाहन नेहमी संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे  करण्यात येते, मात्र तरीही आपणाकडुन कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे या आसमानी संकटामुळे बऱ्याचजणांना जीव गमवावा लागतो. आज आम्ही आपणास वीज अंगावर पडू नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबाबत माहिती देत आहोत. पाऊस सुरु होण्याच्या अगोदर आकाशात ढग जमा होतात आणि गडगडाटीसह वादळी वारा सुरू होतो. यादरम्यानच आकाशात विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी जमिनीवर पडतात. सध्या शेतीपूर्व मशागतीची कामे सुरु झाली असून शेतात काम करणारे शेतकरी, मजूर आणि पशूधन यांना या विजांपासून धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा आपण विजेपासून बचावासाठी झाडाचा आश्रय घेतो, मात्र उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्याही परिस्थितीत घेवू नये. अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्या वस्तूवर जास्त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन त्यांना दोन्ही हातानी आवळुन ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्यांवर टेकवावी. सर्वात जास्त धोका झाडाखाली थांबल्यामुळे उद्भवतो ज्यांच्या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात. झाडाच्या जवळ किंवा खाली उभे राहिल्यामुळे मनुष्याला अशा प्रकारे ईजा होण्याची, दगावण्याची शक्यता असते. तसेच धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकु, गोल्फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्या वरच्या बाजुला असल्यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्यात.   विजा चमकत असताना मोबाइल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्ही, दुरध्वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. तसेच विजा चमकत असताना विद्युत प्लगमध्ये हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर आदी कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक वस्तूची जोडणी देण्यात येवू नये. असे केल्यास आपल्या घरावर वीज कोसळली तर त्यातील प्रभार प्लगच्या माध्यमातून विद्युत प्लगमध्ये येवू शकते आणि घराचे नुकसान होऊ शकते आणि पर्यायी आपल्या जिवीतासही धोका निर्माण होऊ शकतो. आपण जर चारचाकी वाहनात असाल आणि विजा कडाडत असतील तर अशावेळी वाहनातून बाहेर येऊ नये. कारण चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा चमकत असताना छत्री, धातुंची भांडी आदी धातुंच्या वस्तू घेवून बाहेर जावू नये. शिवाय या दरम्यान पाण्यातही अजिबात थांबू नये. पाण्यात असाल तर त्वरीत बाहेर यावे. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्वचेला मुंग्या, झिणझिण्या आल्यासारखे वाटते. तेव्हा समजून घ्यावे की, वीज आपल्यावर पडणार आहे यावेळी त्वरीत जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे. तसेच जवळपास इमारत असल्यास त्वरित इमारतीचा आश्रय घ्यावा, कारण इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्ध नसल्यास गुंफा, कपार यांचा आश्रय घ्या. अशा परिस्थितीत हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्ध झालेच नाही तर उंचीच्या वस्तुंखाली आश्रय घेवू नका.