शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 1:55 PM

Pulses In Shravan : श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

Pulses In Shravan : डाळींचं सेवन आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न भरपूर असतं. डाळींच्या सेवनाने शरीराची कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. पण वातावरण बदलानुसार आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

पावसाळ्यात आपली पचनक्रियां कमजोर होत असते. आपण जे खातो ते पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही डाळी पचनास जड असतात. व्यवस्थित न शिजवल्याने गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या होतात. ज्या लोकांना आधीच या समस्या आहेत त्यांनी खालील डाळींचं सेवन करू नये.

कोणत्या डाळी खाऊ नये

पावसाळ्यात पचन तंत्र कमजोर झाल्यामुळे मसूरची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ, राजमा यांचं सेवन कमी करावं.

काय कराल उपाय?

जर तुम्हाला या दिवसांमध्ये या डाळींचं सेवन करायचं असेल तर त्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. या डाळी शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवाव्या. भाजी करताना त्यात आलं, काळी मिरे, जिरं, हींग टाकावा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते.

वजन कमी करण्यास मदत

डाळी आणि राजमा एका कॅटेगरीमध्ये येतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, यांच्या सेवनाने फॅट आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. यात भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

एनर्जी मिळेल

डाळींमध्ये हेल्दी कार्ब्स भरपूर असतात. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे सेल्स डॅमेज होण्याचा धोका टाळला जातो. डाळींमधील आयर्नमुळे हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य