शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'या' फळाचा असा केला उपयोग तर मुतखड्यावर मिळतो आराम, लगेचच ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:09 IST

लिंबू-पाणी आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर आहे. या सर्वांशिवाय अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे उकळलेले लिंबू पाणी अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू (Boiled Lemon Water Benefits) शकते.

लिंबू सहसा प्रत्येकजण खात असतो. जेवणाची चव वाढवण्यापासून ते अन्न पचवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. निरोगी राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात लिंबू-पाण्याचा समावेश करतात. लिंबू-पाणी आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर आहे. या सर्वांशिवाय अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे उकळलेले लिंबू पाणी अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू (Boiled Lemon Water Benefits) शकते.

खरं तर, लिंबू हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फोलेट अ‌ॅसिडचा एक चांगला स्रोत आहे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, वजन कमी करण्यात आणि मुतखड्यावरही ते प्रभावी असल्याचे आढळले आहे. आज आपण उकडलेल्या लिंबू पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

उकडलेले लिंबू पाणी कसे सेवन करावे -एका भांड्यात अर्धा लिंबू एक ग्लास पाण्यात उकळवा. साधारण पाच मिनिटे उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी तुम्ही मीठ किंवा मधाव्यतिरिक्त काहीही न घालता तुमच्या आवडीनुसार पिऊ शकता. रस पिळून सोबतच त्याची सालदेखील उकळून पिणं चागलं. या हेल्दी पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. मात्र, लक्षात असू दे की, लिंबाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास त्यामुळे त्वचेची अ‌ॅलर्जी आणि खाज सुटू शकते. त्यामुळे दररोज किती प्रमाणात लिंबाचा रस घेणे योग्य आहे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पिणं योग्य ठरेल.

लिंबू-पाणी उकळून पिण्याचे त्वचेला फायदे -लिंबू पाणी उकळून प्यायल्याने त्वचेतील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि डागरहित दिसतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने, उकळलेले लिंबू पाणी अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे त्वचेतील मुक्त रॅडिकल्स कमी होऊन त्वचा चमकते.

उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त -उकळलेले लिंबू पाण्याचे सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्याचे काम करतात. यासाठी आपल्याला हवे असल्यास लिंबाचा रस मिसळून ब्लॅक टी देखील पिऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते -उकळलेले लिंबू पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. व्हायरल इन्फेक्शन सारख्या आजारांशी लढण्यासाठी हे प्रभावी आहे. तसेच, यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी -उकळलेले लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. लिंबू पाणी मधासोबत सेवन केल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीर हायड्रेटही राहते.

पचनक्रिया सुधारते -अनेक वेळा असंतुलित आहार घेऊनही पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटदुखी अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत रोज सकाळी रिकाम्या पोटी उकळलेले लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

मुतखड्यावर गुणकारी -लिंबू पाणी प्यायल्याने मुतखड्यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा प्रभाव कमी होतो. हे ऑक्सलेट हार्ड डिपॉझिटच्या स्वरूपात उद्भवते, ज्यामुळे वेदना, मळमळ आणि उलट्या होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स