शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

हाता पायाला मुंग्या येतात? क्रॅम्प्सही येतात? ही असू शकतात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 5:24 PM

हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात. असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं.

अनेक वेळा आपल्याला विविध रोगांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. त्यामागचं मुख्य कारण अनियमित आहार किंवा कामाच्या व्यापात आहाराकडे झालेलं दुर्लक्ष हे असतं. कोणताही थंड पदार्थ खाल्ल्यावर सर्दी, खोकला तर कधी-कधी तापही येतो. यामागचं आणखी एक कारण म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारशक्तीचा स्तर कमी झालेला असतो. म्हणूनच तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. हाता-पायाला मुंग्या येणं, पेटका (Cramps) येणं, स्नायू आखडले जाणं (Muscle Contraction) यांसारखे त्रास अनेकांना जाणवतात. असं होण्यामागे योग्य पोषणतत्त्वांची, जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण असू शकतं. ऐकून धक्का बसला ना? मग तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे, की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे घडू शकतं.

एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिलो किंवा आपला हात किंवा पाय एका विशिष्ट स्थितीत काही काळ राहिला तर आपल्या हाताला-पायाला मुंग्या येतात. जीवघेणी कळ येणारा पेटका येऊ शकतो. बर्‍याच वेळा झोपेत एका कुशीवर जास्त वेळ झोपलो तर हातापायात गोळे येतात. हा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असतो. हे असं होण्यामागचे कारण म्हणजे स्नायूंचं चलनवलन (Lack of Muscle Movement) न झाल्याने हाता-पायांवर ताण येतो, स्नायू आखडले जातात.

स्नायू आखडले गेल्याने रक्ताभिसरण (Uneven Blood Circulation) अनियमित होतं किंवा काही काळासाठी थांबतं; पण केवळ हेच कारण नसून शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील हे घडू शकतं. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) आणि डाएटिशियन (Dietician) गरिमा गोयल ह्यांनी 'ओन्लीमायहेल्थ डॉट कॉम'ला दिलेल्या माहितीत हा खुलासा केला आहे.

डॉ. गरिमा गोयल म्हणाल्या, की काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे शरीरातले स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे कायमस्वरूपी इजादेखील होऊ शकते. ज्या वेळेस रक्तवाहिन्या दुखावल्या जातात, त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो. रक्ताभिसरण अनियमित झाल्याने जे रक्त वाहिन्यांमध्ये साचून राहतं, त्यामुळेच मग ब्लॉकेजेसची (Blockages in Blood Veins) समस्या उद्भवू शकते.

डॉ. गरिमा गोयल यांच्या मते आपल्या नियमित आहारात वरच्या व्हिटॅमिन्सचं प्रमाण संतुलित नसतं आणि त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषणतत्त्वं मिळत नाहीत. त्या कमतरतेमुळे अनेक परिणाम घडू शकतात. त्यातला एक परिणाम म्हणजे हातापायात मुंग्या येणं. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर हाता-पायाला पिन किंवा सुई टोचत असल्यासारखं वाटत राहतं. याचं कारण शरीरातली उपलब्ध व्हिटॅमिन्स ही नर्व्हस सिस्टीमला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असतात, जेणेकरून नर्व्हस सिस्टिम आपलं काम करू शकेल.

- व्हिटॅमिन बी 12 हे स्नायू आणि वाहिन्यांभोवती सुरक्षा कवच बनवण्याचं काम करतं. त्यामुळे वाहिन्यांना कुठलीही इजा होत नाही. नसा किंवा स्नायू आखडणं हे बहुतांशवेळा हाता-पायांच्या बाबतीतच होते, ज्याला वैद्यकीय भाषेत पेरिफेरल नर्व्ह म्हटलं जातं; पण ज्या वेळेस या नर्व्ह सिस्टिमलाच इजा पोहोचते त्या वेळेस मुंग्या येणं, पेटका किंवा गोळा येणं, स्नायू आखडणं या समस्या उद्भवतात. व्हिटॅमिन बी 1, बी 6, बी 9 आणि व्हिटॅमिन ई यांसारखी अ‍ॅटिऑक्सिडंट्सदेखील नर्व्हस सिस्टिमला सक्षम बनवण्याचंच काम करतात.

- डॉ. गरिमा गोयल यांच्या मते आहाराच्या अनियमित वेळा आणि दगदगीची जीवनशैली ह्यामुळे शरीरास उपयोगी अशी पोषणतत्त्वं मिळत नाहीत. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास शरीराला आवश्यक ती घटकद्रव्यं आणि पोषणतत्त्वं (Nutritions) मिळतात. ही उपयुक्त व्हिटॅमिन्स पुढीलप्रमाणे :

1. व्हिटॅमिन बी 1ची कमतरता भरून काढण्यासाठी धान्यं, फळभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, सुकामेवा आणि मांसाहार आदींचा आहारात समावेस असावा. तसं असल्यास हे व्हिटॅमिन विपुल प्रमाणात मिळतं.

2. व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता भरून काढण्यासाठी बटाटा, सुका मेवा, पौष्टिक धान्यं, कडधान्यं, मासे, चिकन यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. फक्त आंबट फळं किंवा पदार्थ वर्ज्य करावेत.

3. व्हिटॅमिन बी 9 ची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, राजमा, फळभाज्या, सगळी द्विदल धान्यं-डाळी, सूर्यफुलाचं बी यांचा आहारात समावेश करावा लागतो.

4. व्हिटॅमिन बी 12ची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर यांचं नियमित सेवन गरजेचं असतं. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या, चिकन आणि मासे यातही व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असतं.

5. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा आणि डाळी ह्यांचा आहारात समावेश करावा. तसंच हिरव्या पालेभाज्यांसोबत अन्न शिजवताना व्हेजिटेबल ऑइलचा वापर करावा.

हातापायात मुंग्या येणं, स्नायू आखडणं ही समस्या काही वेळाने ठीक होते. परंतु, आपल्यापैकी कुणालाही ही समस्या सतत उद्भवत असेल, तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणंच इष्ट आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार करावेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स