शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Corornavirus: कोरोना...डर के आगे जीत है; कोविडची भीती वाटत असेल तर 'या' सात टिप्स पडतील उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:16 AM

Corornavirus: मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादयक ठरू शकते

लोकमत न्यूज नेटवर्क

एकीकडे कोरोनाचे आकडे नियमित वाढत आहेत. नियमित होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असतानाच चिंता, भीती, नैराश्य, नकारात्मक अशा वातावरणात व या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भीतीपोटी अनेकांना मोठा धक्का बसून त्यांना जीव गमवावा लागत असल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. अशा स्थितीत अतिकाळजी किंवा निष्काळजीपणा यातील मध्य साधून आणि सकारात्मकता शोधून आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवा, असा सल्ला शहरातील काही मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

निष्काळजीपणा धोकादायक

काही जण अगदीच बिनधास्त व कुठलेच नियम न पाळता मुक्त संचार करीत असल्याने अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. आम्हाला काही होणार नाही, आम्हाला का कोरोना झालाय का? अशा अनेक गैरसमजातून त्यांचा बिनधास्तपणा वाढतो, तो आताच्या स्थितीत अधिक धोकादायक आहे.

अतिकाळजी धोकादायक

कोरोनाचे वेळीच निदान झाल्यास वेळीच उपचार सुरू झाल्यास पुढील धोके टळतात, हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादायक ठरू शकते, यामुळे चिंता, नैराश्य अशा भावना वाढू शकतात. झोप न येणे, नकारात्मकता वाढणे या गोष्टी होऊ शकतात. या गोष्टी नंतर तुमच्या शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात.

भीती वाटतेय तर हे करा

कोरोनाची लक्षणे सर्वश्रुत आहेत. यातील लक्षणे जाणवल्यानंतर घाबरून न जाता थेट तपासणी करून घ्या. जे असेल ते एकदाचे स्पष्ट झाले म्हणजे मनातील भीती तात्काळ निघू शकते. आणि बाधित आढळून आलाच तरी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतल्यास काहीच होणार नाही, ही सकारात्मकता ठेवा. कोरानात मृत्यूदर हा कमी आहे. पण यासाठी वेळीच उपचार हवे.

या आहेत काही टीप्स

वारंवार कोरोनाबाबतच विचार करू नका

एखाद्या चांगल्या छंदात स्वत:ला गुंतवून ठेवा

मन, विचार नेहमी प्रसन्न ठेवा

ताणतणावावर मात करीत सक्षमपणे मार्ग काढता येतो, हा विचार नेहमी मनात ठेवा

कोरोनाच्या वारंवारच्या आकडेवारीपासून लांब रहा

पुरेशी काळजी घ्या, पुरेसी झोप घ्या, प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्या, योग्य पौष्टिक आहार घ्या.

गरजूंना मदत करा, याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

...........................

सध्या कोरोनाचे प्रमाण खूप वाढले आहे. यात असुरक्षितता आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, निष्काळजीपणाने वागणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. अशा स्थितीत अवास्तव भीती न बाळगता स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चिंता, नैराश्य वाटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मका शोधा, नवी संधी शोधा, एखादा छंद जोपासा.

- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

.........................

गैरसमज, बेधडकपणा ही कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य चूक आहे. कोरोना झाल्यानंतर मग अनेक बाबींच्या बाबतीत तणाव घेतला जातो. त्यामुळे निष्काळजीपणा व अतिकाळजी यातील फरक ओळखून वर्तणूक ठेवल्यास आपले मानसिक स्वास्थ्य अशा परिस्थितीत निरोगी राहू शकते, जे आताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. ताणतणावावर मात करून सक्षमपणे मार्ग काढा. लक्षणे आल्यानंतर भीती वाटत असल्यास सर्वात आधी तपासणी करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व काही करा, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ नका.

- डॉ.दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या