शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

खोकला, सर्दी, ताप... H3N2 इन्फ्लूएंझापासून कधी होणार सुटका? आरोग्य मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 8:25 PM

कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर लोकांना घाबरवत आहे. हे पाहता सरकारने इन्फ्लूएंझाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

H3N2 इन्फ्लुएंझाने देशात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक राज्यात याने हातपाय पसरले आहेत. यामध्ये केरळ, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर लोकांना घाबरवत आहे. हे पाहता सरकारने इन्फ्लूएंझाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ICMR ने एडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये लोकांना खबरदारीच्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मार्च अखेरीस सीझनल इन्फ्लूएंझा कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात H3N2 इन्फ्लूएंझाची सुमारे 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी काही H1N1 आहेत. आतापर्यंत फक्त या दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा व्हायरसबाबत माहिती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यांमध्ये मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग केले जात आहे. हे IDSP नेटवर्कद्वारे रिअल टाइम आधारावर केले जात आहे.

विशेषत: सीझनल इन्फ्लूएन्झाच्या H3N2 उपप्रकाराची प्रकरणे निरिक्षणाखाली आहेत. ICMR ने या संदर्भात एक सूचना जारी केली आहे. इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मार्च अखेरीस इन्फ्लूएन्झा कमी होण्याची अपेक्षा आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की, भारतात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सतत खोकला आणि तापासह सर्दी होण्याचे कारण म्हणजे 'इन्फ्लुएंझा ए' चा 'H3N2' उपप्रकार आहे. त्याच वेळी, इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वाढत्या खोकला आणि सर्दी प्रकरणांमध्ये अँटीबायोटिकच्या अतिवापराबद्दल इशारा दिला होता.

H3N2 व्हायरस हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. त्याला हाँगकाँग फ्लू असेही म्हणतात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा विषाणू शरीराच्या रोगांपासून संरक्षण करणाऱ्या व्हाईट ब्लड सेल्स (WBC) कमी करतो. यामुळे ल्युकोपीनिया होतो. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा व्हायरसमुळे गंभीर स्थिती निर्माण होते.

H3N2 व्हायरसमुळे तापातून बरे होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. खोकला निघून जाण्यासाठी 3-4 आठवडे लागतात. यामध्ये पॅरासिटामॉल घेता येते. या व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्य