शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 3:13 PM

जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जुलाब लागणे (Diarrhea) हा तसा फारसा गंभीर आजार नाही. काही दिवसांमध्येच हा आजार पूर्णपणे बरा होऊन जातो. फूड पॉयझनिंग, एखाद्या औषधाचा परिणाम किंवा शिळे पदार्थ खाणं अशा गोष्टींमुळे डायरिया, म्हणजेच जुलाब होऊ शकतात. अर्थात, जर आठवड्याभरानंतरही जुलाब सुरूच राहिले, तर त्याचं कारण (Diarrhea causes) इन्फेक्शन किंवा आतड्यांची सूज असंही असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जुलाबाची लक्षणंजुलाबाची लक्षणं (Diarrhea symptoms) ही आधी सांगणं कठीण आहे. मात्र, जुलाबांमुळे थकवा, उलटी, पोटदुखी, ब्लोटिंग, ताप येणं, विष्ठेतून रक्त किंवा पू येणं, वजन कमी होणं अशा प्रकारची लक्षणं जुलाब सुरू झाल्यानंतर हळूहळू दिसू लागतात.

डायरिया झाल्यावर काय खाऊ नयेजुलाबाचा थेट संबंध हा आपल्या खाण्याशी असतो. त्यामुळे जुलाबाची लागण झालेली असताना आपण काय खातो आणि काय खाणं (What not to eat during Diarrhea) टाळायला हवं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. काही पदार्थ असे आहेत, जे तुमचा त्रास आणखी वाढवू शकतात. यामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, फ्राइड, फॅटी फूड, मसालेदार पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पोर्क, कच्च्या भाज्या, कांदा, मका, आंबट फळं, दारू, कॉफी, सोडा तसंच आर्टिफिशिअल स्वीटनर घाललेले पदार्थ यांचा समावेश होतो. त्यामुळे जुलाब झालेले असताना या यादीमधील पदार्थ टाळणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं.

हे पदार्थ खाऊ शकताजुलाब लागल्यानंतर जास्तीतजास्त पाणी प्यायला हवं. सोबतच, कमी चहापूड टाकलेला चहा, शहाळं हेदेखील पिऊ शकता. थोडाफार आराम मिळू लागल्यास तुम्ही केळी, भात, सफरचंद, ब्रेड, अंडी आणि शिजवलेल्या भाज्या यांचंही सेवन (What can you eat during Diarrhea) करू शकता. हे सर्व पदार्थ पचायला हलके असल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर याचा ताण येत नाही.

घरगुती उपायघरच्याघरी योग्य आहार, औषधं यांच्या मदतीने तुम्ही जुलाबावर उपचार (Diarrhea home remedies) करू शकता. कित्येक वेळा बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यामुळे जुलाब होतात. अशावेळी अँटिबायोटिक्स औषधाची गोळी किंवा पातळ औषध घेतल्याने मदत मिळते. सोबतच प्रोबायोटिक्स खाणंही फायद्याचं ठरतं.

या घरगुती उपायांनंतरही जुलाब ठीक होत नसतील, आणि 2 दिवसांहून अधिक काळ समस्या सुरूच राहिली; तर डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. जुलाबांमधून भरपूर पाणी जाऊन डीहायड्रेटेड झाल्याने अशक्तपणा वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. गंभीर स्वरुपात जुलाब झाल्यास रुग्णालयात भरतीदेखील होण्याची गरज भासू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स