शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:05 IST

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात.

(Image Credit : Shakthi Health & Wellness Center)

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात. काही लोकांना त्यांना तणाव असल्याचं कळतं, पण काहींना कळतही नाही. अशात नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नाही. मात्र अनेक शोधांनुसार, सतत येणाऱ्या तणावामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी होतं. पण हा तणाव दूर कऱण्यासाठी एक सोपा उपाय समोर आला आहे. 

डान्स केल्याने तणाव होतो कमी

(Image Credit : The New York Times)

दररोज १५ मिनिटे डान्स केल्याने एंजॉर्फिन लेव्हल नियंत्रित राहतं. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर होते. डान्स केल्यानंतर तुम्हाला हलकं जाणवतं. कारण याने कॅलरी कमी होतात. डान्सने मन आणि शरीर यांत्यात समतोल साधला जातो. तसेच डान्स केल्याने शरीर लवचिकही होतं. 

हृदय राहत निरोगी

इटलीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, ज्या लोकांना हृदयासंबंधी आजार आहेत. त्यांनी रोज डान्स करायला हवा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डान्स केल्याने हृदयात रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच डान्स केल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. अमेरिकेतील नॅशनल हार्ट, लंग अॅन्ड ब्लड इन्स्टिट्यूट द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, बॉल डान्सने कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका कमी होतो. 

डान्स करा वजन कमी करा

जर तुम्ही दररोज डान्स करत असाल तर याने तुमच्या १५० ते ५०० कॅलरी बर्न होतात. त्यामुळे झुम्हा डान्सला वजन कमी करण्यासाठी चांगला डान्स मानला जातो. हा डान्स जर तुम्ही ६० मिनिटांसाठी केला तर ४०० ते ६०० कॅलरी बर्न होतात. तसेच मांसपेशीमध्ये ताणही येतो. पोटाच्या मांसपेशी लवचिक होतात. त्यामुळे पचनक्रियाही चांगली होते. 

हाडे होतात मजबूत

तारुण्यात जर तुम्ही डान्सचा तुमच्या दैंनंदिन जीवनात समावेश केला तर वाढत्या वयात तुम्हाला हाडांशी संबंधित आजार कमी होतील. याने ऑस्टियोपोसोसिस ठीक होतो. डान्सने हार्मोन्स नियंत्रित होतात. याने हाडांमधील कॅल्शिअम कमी होणं रोखलं जातं. 

एक्सपर्टचा सल्ला

डान्स करणे आपल्या भावना व्यक्त करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. जे अनेकजण बोलून व्यक्त करत नाहीत ते डान्सने करु शकतात. कारण शारीरिक हालचाह ही विचार आणि जाणिवांशी संबंधित असते. त्यामुळेच तुमच्यात सकारात्मक बदल बघायला मिळतात. पण यासाठी एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्यावा.

वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तींना येणारा ताण हा नेहमीच त्रासदायक असतो. ताण कमी असेल तर फार फरक पडत नाही पण हाच जर जास्त झाला तर याचा जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त ताण आल्याने ऑफिस किंवा घरातील तुमची सर्व कामे प्रभावित होऊ शकतात.ही ती स्थिती असते जेव्हा एखादी व्यक्ती सहन करण्याची क्षमता गमावून बसतो. या कारणाने ही व्यक्ती कामात चांगलं प्रदर्शन करु शकत नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, तणावाचं प्रमाण हे वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि वैयक्तिक क्षमतेनुसार वेगवेगळी असते. 

तणावाचं प्रमाण पॅरामिटर्सच्या आधारावर मॉनिटर केलं जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला तणावाच्या स्त्रोतापासून दूर जायचं असेल तरच...तणावाच्या मोठ्या कारणांपासून बचाव करण्याची इच्छा हे तणाव वाढण्याचं मुख्य कारण असण्याचं संकेत आहे. डॉक्टरांनुसार, 'अनेकजण जास्त तणावाच्या वातावरणात जीवन जगणे सुरुच ठेवतात. त्यांना या गोष्टींची माहितीच नसते की, सतत होणारी डोकेदुखी, सतत येणारा राग आणि शांत झोप न लागणे ही तणावाची कारणे असू शकतात. हे सामान्य लक्षण तणावाची असू शकतात आणि हे तुम्हाला स्वत:ला ओळखावी लागतात. जेव्हा तुमचा तणाव प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा तुमचं दैनंदिन जीवन प्रभावित होतं'.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स