शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

जास्ती जास्त लोक फळं खाताना करतात 'या' चुका, जाणून घ्या योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:41 AM

Fruits Eating Mistakes : बरेच लोक फळांचं सेवन करत असताना काही चुका करतात. या चुका जर केल्या तर फळांपासून फायद्यांऐवजी नुकसान जास्त होतं.

Fruits Eating Mistakes : आपल्या शरीरासाठी वेगवेगळी फळं किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहीत असेलच. कारण फळांचं सेवन केल्याने शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व मिळतात. इतकंच काय तर अनेक फळं खाऊन तुम्ही शरीराच्या वेगवेगळ्या समस्याही दूर करू शकता. सफरचंदसारखं फळ जर तुम्ही नियमित खाल्लं तर हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो. पण बरेच लोक फळांचं सेवन करत असताना काही चुका करतात. या चुका जर केल्या तर फळांपासून फायद्यांऐवजी नुकसान जास्त होतं. आज फळं खाताना कोणत्या चुका करू नये हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला फळांमधील पोषक तत्वांपासून शरीरासाठी फायदा मिळवायचा असेल तर फळं योग्य पद्धतीने खाणं गरजेचं आहे. फळं खाण्यादरम्यान काही चुका टाळल्या पाहिजे.

रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नये

आंबट फळं जसे की, संत्री, लिंबू आणि द्राक्ष इत्यादी फळं रिकाम्या पोटी कधीच खाऊ नयेत. असं जर केलं तर तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. या फळांमध्ये अॅसिड असतं ज्यामुळे ही समस्या होते.

दुधासोबत कोणतं फळ खाऊ नये

दूध आणि केळी सोबत खाल्ल्याने तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. पण हे इतर फळांसोबत लागू पडत नाही. जसे की, दूध आणि पपई किंवा लीचीचं सेवन करणं मोठी चूक ठरेल. असं केलं तर दूध आणि फळं पचवण्यास समस्या होते.

रात्री फळं खाता?

रात्री जर फळांचं सेवन करणं काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. फळांचं सेवन नेहमी सकाळी किंवा दुपारी करावं. तेव्हाच त्यांतील पोषक तत्वांचा अधिक फायदा मिळतो.

जेवणासोबत फळं टाळा

जेवणासोबत किंवा जेवण केल्यावर लगेच फळं खाणं टाळलं पाहिजे. याने तुम्हाला अन्न पचनास समस्या होऊ शकते. दुपारचं जेवण केल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनंतर फळं खावीत.

फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिता?

फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पित असाल तर ही सवय लगेच बंद करा. असं केल्याने पचन क्रिया हळूवार होते. फळं खाल्ल्यानंतर 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. 

जास्त वेळ फळं कापून ठेवता?

फळं जास्त वेळ कापून तशीच ठेवल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात. तसेच फळं लवकर खराब होतात. फळांपासून फायदा मिळवण्यासाठी ती लगेच खावीत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य