शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

By admin | Published: May 05, 2017 4:19 PM

जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात.

 

आपण रोज अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या आपल्या रोजच्या सवयीचा भाग असतात. आणि सवय म्हटली की ती जशी चांगली असते तशी वाईटही. अनेक सवयींमधून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो पण आनंद मिळतो म्हणून या सवयी चांगल्याच असतात असं नाही. उलट काही सवयी नुसत्या वाईट असतात असं नाही तर धोकादायकच असतात. जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात. तेव्हा आरोग्यदायी जगायचं असेल तर जेवणानंतरच्या या पाच गोष्टी तातडीनं थांबवायला हव्यात.

1. जेवणानंतर चहा कॉफीचे कप

अनेकांना सकाळ दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा कॉफी प्यायची सवय असते. यामुळे अनेकांना विशेषत; दुपारच्या वेळेस ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण ही सवय अत्यंत घातक आहे. मुळातच चहा कॉफीमध्ये टॉक्सिन्स असतात. आणि जेवल्यानंतर लगेच चहा कॉफी प्यायलानं हे टॉक्सिन्स अन्नातील घटकांना शरीरापर्यंत पोहोचूच देत नाही. विशेषत: लोह आणि प्रथिनं या अन्नघटकांना शरीरापर्यंत पोहोचण्यास चहामुळे अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांनी तर ही सवय लगेच मोडावी. जेवणानंतर साधारणत: तासाभरानं चहा प्यायला तर चालतो.

 

   

2. भराभर चालणं.

जेवणानंतर चालायला जाण्याची सवय अनेकांना असते. खरंतर ही सवय चांगलीही आहे. पण जेवणानंतर लगेच चालण्याचे मात्र अनेक तोटेच आहेत. जेवल्यानंतर जर खास पचनासाठी आपण लगेच चालायला सुरूवात केली तर अन्न पचायलाच त्रास होतो. कारण पोटात एकवटलेले सर्व अन्नरस जेवणानंतर लगेचच्या चालण्याने वाहून जातात. आणि त्यामुळे अन्न पचायलाही अवघड जातं. अन्नरस वाहून गेल्यानं पोटात आम्ल म्हणजे अ‍ॅसिड तयार होतात ज्याचा परिणाम म्हणून अपचन होतं. आणि म्हणूनच जेवल्यानंतर साधारणत: अधर््या तासानं फिरायला जावं. आणि हे फिरणं दहा मीनिटांपेक्षा अधिक असू नये.

 

3. फळं खाणं.

फळं खाण्यासंबधी अनेक समज आणि गैरसमज आहे. अनेकजण म्हणतात की फळं नीट पचत नाही म्हणून ती रिकाम्या पोटी खावू नये म्हणून. तर कोणी म्हणतं रात्री फळं खाऊ खाऊ नये म्हणून. पण सत्य हे आहे की फळामध्ये जी साखर असते ती सहज पचण्यासारखी असते त्यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळी फळं खावं. अपवाद फक्त जेवल्यानंतर लगेचचा. जेवल्यानंतर लगेच फळ खाण्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच खूप होतो. कारण जेवल्यानंतर फळ खाल्लं तर त्याचं पचन होण्यासाठी पुढे सरकू शकत नाही. कारण पोटात जेवल्यामुळे अन्न असतं. त्यामुळे फळ फोटात तसंच पडून राहतं. आणि पोटात हे पचनाविना पडून राहिलेलं फळ धोकादायक असतं.जेवल्यानंतर साधारणत: एखाद्या तासानं फळ खाणं फायदेशीर ठरतं.

 

4. छोटीशी डुलकी

जेवल्यानंतर डुलकी घ्यायची म्हणून लगेच झोपणं ही धोकादायक सवय आहे. अन्न पचनासाठी गुरूत्वाकर्षण ही संकल्पना खूप काम करते. जेवल्यानंतर झोपण्यासाठी म्हणून लगेच आडवे पडलो तर पोटातील अन्नरस पोटातून बाहेर पडतात , ते पोटात थांबत नाही. त्यामुळे आतड्यात जळजळ अ‍ॅसिडिटी यासारखे त्रास होतात. त्यामुळे जेवल्यानंतर झोपलं तर आराम मिळण्याऐवजी उलटा अ‍ॅसिडिटीचा त्रासच आपण ओढावून घेतो.

 

 

 

5. आंघोळ करणं.

जेवल्यानंतर लगेचच्या आंघोळीमुळे थेट पचनसंस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. आंघोळ करताना शरीराचं तापमान वाढतं. ते कमी करण्यासाठी मग रक्तप्रवाह आणि ऊर्जा त्वचेकडे सरकते. जेवल्यानंतर रक्तप्रवाहाची आणि ऊर्जेची गरज पोटात असते कार्ण त्यातूनच अन्नाचं पचन होणार असतं. पण आंघोळीमुळे ही सर्व प्रक्रिया उलट दिशेने होवून अन्न पचायला ऊर्जाच शिल्लक राहात नाही. परिणामी पचनाच्या संबंधीचे आजार सतत ये-जा करत राहतात.

 

6. सिगारेट ओढणं.

जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणं ही सवय अनेकांना (विशेषत: पुरूषांना) असते. या सवयीमुळे कॅन्सरची , श्वसनासंबंधीच्या विकारांची शक्यता बळावते. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढल्यानं अल्सर होतो.