शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:55 IST

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत.

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने वजन कमी करण्याचा किंवा पोटाची चरबी कमी करण्याचा दावा खूप प्रसिद्ध आहे. पण या दाव्यात नेमकं कितपत तथ्य आहे ते जाणून घेऊया...

गरम किंवा कोमट पाणी किती फायदेशीर?

गरम पाण्याने चरबी कमी होत नाही परंतु शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. चहा-कॉफी सारख्या कॅलरी पेयांपेक्षा गरम पाण्याची निवड केल्याने तुमचं एकूणच वजन कमी करण्याचं ध्येय असल्यास त्यासाठी मदत होते. यासोबतच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली केल्यास अधिक लवकर चांगले परिणाम मिळतील.

डॉक्टर काय म्हणतात?

गुरुग्रामच्या मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांनी IndiaToday.In ला दिलेल्या माहितीनुसार, गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र यावेळी आपल्या शरीरासाठी योग्य ठरेल इतकंच गरम पाणी प्यावं अन्यथा तोंडाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी प्या. 

गरम पाणी पिण्याचे फायदे 

- गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. - तज्ज्ञांनी सांगितले की गरम पाणी कोरड्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते.- डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्या. - पाण्याचे तापमान सुमारे ५० डिग्री सेल्सिअस असावं. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते.- जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटते, ज्यामुळे कॅलरी कमी होऊ शकतात.- तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, त्वचेची चमक वाढविण्यास, पचनास मदत करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतं.

किती पाणी प्यावं?

डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर दिवसभरात किमान पाच ग्लास गरम पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड आणि संतुलित राहतं. 

टॅग्स :Healthआरोग्य