शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 1:44 PM

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत.

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने वजन कमी करण्याचा किंवा पोटाची चरबी कमी करण्याचा दावा खूप प्रसिद्ध आहे. पण या दाव्यात नेमकं कितपत तथ्य आहे ते जाणून घेऊया...

गरम किंवा कोमट पाणी किती फायदेशीर?

गरम पाण्याने चरबी कमी होत नाही परंतु शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. चहा-कॉफी सारख्या कॅलरी पेयांपेक्षा गरम पाण्याची निवड केल्याने तुमचं एकूणच वजन कमी करण्याचं ध्येय असल्यास त्यासाठी मदत होते. यासोबतच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली केल्यास अधिक लवकर चांगले परिणाम मिळतील.

डॉक्टर काय म्हणतात?

गुरुग्रामच्या मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांनी IndiaToday.In ला दिलेल्या माहितीनुसार, गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र यावेळी आपल्या शरीरासाठी योग्य ठरेल इतकंच गरम पाणी प्यावं अन्यथा तोंडाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी प्या. 

गरम पाणी पिण्याचे फायदे 

- गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. - तज्ज्ञांनी सांगितले की गरम पाणी कोरड्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते.- डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्या. - पाण्याचे तापमान सुमारे ५० डिग्री सेल्सिअस असावं. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते.- जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटते, ज्यामुळे कॅलरी कमी होऊ शकतात.- तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, त्वचेची चमक वाढविण्यास, पचनास मदत करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतं.

किती पाणी प्यावं?

डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर दिवसभरात किमान पाच ग्लास गरम पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड आणि संतुलित राहतं. 

टॅग्स :Healthआरोग्य