शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का ? रात्रीचा 'हा' आहार शरीराचे नुकसान करेल वेळीच काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:57 AM

संध्याकाळी ७ वाजताच जेवण करावे असा सल्ला दिला जातो. जेवणाच्याही वेळा असतात. कधी आणि काय खावे याचे नियम आहेत त्यांचे जर पालन केले तर पोटाच्या विकारांपासून दूर राहाल.

अनेकांना सवय असते रात्री भरपेट जेवून झोपण्याची. दिवसभर थकून आल्यावर रात्री जास्त आहार घेतला जातो. खूप कमी लोक असतील जे रात्री जेवल्यानंतर काही वेळ चालायला जात असतील. जेवल्या जेवल्या झोपण्याच्या सवयीमुळे अपचन होते. सतत पोटात जळजळ होते त्यामुळे नीट झोपही लागत नाही. यामुळेच कोणत्या वेळी काय खाल्ले पाहिजे हे आयुर्वेदात सांगितले आहे. चुकीच्या वेळी चुकीचा आहार घेतल्याने अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आता बघुया रात्री कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

१. प्रोसेस्ड किंवा स्नॅक्स 

रात्री अबरचबर खाण्याची अनेकांना सवय असते. स्नॅक्स सारख्या गोष्टी जर रात्री खात असाल तर आधी ही सवय थांबवा. कारण अशा पदार्थांमध्ये काही त्तव असतात जे अपचनाला कारणीभूत ठरतात. भविष्यात याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.

२. तळलेले पदार्थ 

तळलेले पदार्थ दिवसा खाल्ले तर ते पचतात मात्र रात्री या पदार्थांना पचनासाठी वेळ लागतो. यामुळे पोटात टॉक्सिंस होतात म्हणजे गॅस, उलटी यासारख्या समस्या उद्भवतात. तर असे पदार्थ शक्यतो रात्री खाणे टाळावे.

३. फळं

फळं ही शरिरासाठी उत्तम आहेतच मात्र फळं खाण्याचीही एक वेळ असते. फळं ही थंड असतात यामुळे ती रात्री खाल्ली तर सर्दी, ताप अशा समस्या येऊ शकतात. अॅलर्जी देखील होऊ शकते. फळं खाल्ल्यानंतर लगेच जेवण करु नये आणि जेवणानंतर लगेच फळांचे सेवन करु नये यामध्ये एक ते दिड तासांचे अंतर असावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.

४. रेड मीट

जे मांसाहार करतात त्यांना हिवाळ्यात रेड मीट खायला आवडते. शरिरात ऊर्जा आणि गरमी यावी म्हणून रेड मीट खाल्ले जाते. मात्र याचे साईड इफेक्ट होतात. रेड मीट पचायला जास्त वेळ लागतो. झोपल्यानंतर याचे परिणाम दिसू लागतात.

५. दही

आयुर्वेदात रात्री दही खाणे वर्ज्य आहे. रात्री दही खाल्ल्याने शरिराच्या तापमानात फरक पडतो. असंतुलनामुळे इतर विकार होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री शक्यतो दही न खाल्लेले बरे.

जेवल्यानंतर किती वेळाने झोपावे

पोटाचे विकार होऊ नये म्हणून रात्रीच्या जेवणाच्या वेळांवर लक्ष द्या. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की संध्याकाळी ७ वाजताच जेवावे. कारण जेवल्यानंतर किमान ३ तासांनी झोपण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पचनक्रिया सुरळित होते. जे याचे पालन करतात ते पोटाच्या विकारांपासून दूर राहतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न