शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

फास्ट फुड, नो एक्सरसाईज हीच नाहीत वजन वाढण्याची कारणं, 'हे' कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 5:16 PM

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

वजन वाढण्याची खुप कारणं असतात. त्यापैकी व्यायामाचा अभाव व अनहेल्दी खाण्याच्या सवयी या जास्त जबाबदार असतात. मात्र, वजन वाढवण्यासाठी बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

तणावामुळे वजन वाढतेआपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते.

अनहेल्दी खाणंतणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.

आळस येणे कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सतत आळस येतो. त्यामुळे आपण व्यायाम करणे टाळतो. तसेच आपण शरीरारीक हालचाल करायलाही कंटाळतो.

भूक न लागणे किंवा भूक वाढणे तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.

काय उपाय करालयोग्य आहार घ्या वजन कमी करण्याचा अर्थ उपाशी राहणे नव्हे तर आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे होय. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी आरोग्यदायी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

जास्तीतजास्त पाणी प्यापाणी हा उर्जेचा मुख्य स्रोत आहे. पाण्यामुळे तुमचे पचन कार्य व्यवस्थित होते. तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाण्यामुळे तुमची भूकही कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स