शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:19 AM

काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो.

- ओमकार गावंडमुंबई : निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपवास करणे आवश्यक असल्याचे नेहमी आहार तज्ञ सांगतात. यासाठी भारतात अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी हे उपवास सर्वांना फलदायी ठरतात. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे अनेक आजार वाढतात. त्यामुळे अनेक जण आठवड्यातून एकतरी उपवास करतातच.मात्र काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो. उपवासाच्यावेळी योग्य आहाराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहार तज्ञाचा योग्य सल्ला घेऊन उपवास केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.एकादशी दुप्पट खाशी, असे नको !उद्या उपवास धरायचा आहे, म्हणून आदल्या दिवशी जास्त खाणे किंवा उशिरा खाणे योग्य नाही. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी चहा, दूध, बटाट्याचे तळलेले पदार्थ यांचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. तसेच रात्री उपवास सोडताना देखील समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तरच उपवास सफल होऊ शकतो.उपवासाला काय खावे?शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. दर दोन ते तीन तासांनी फळे खावीत. उपवासाला चालणारी भाजी व दही हलक्या प्रमाणात खावे. दिवसभर उत्साह टिकून राहावा यासाठी लिंबू पाणी व ताक यांचे सेवन करत रहावे.काय खाऊ नयेउपवासाला चालते म्हणून खिचडी, तळलेले साबुदाणा वडे, शेंगदाणे, चहा यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. बाहेरून आणलेले तळलेले वेफर्स, चिवडा तसेच उपवासाचे इतर पदार्थ खाणे टाळावे.निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, चांगला आहार या गोष्टींसोबतच उपवास देखील महत्त्वाचा आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो पाणी व फळांचा रस यावरच भर दिला पाहिजे. हल्ली उपवासाच्या नावे लोक इतर दिवसांपेक्षा जास्त तेलकट व गोड पदार्थ खातात. ते टाळायला हवे.- डॉ. समीर नाईक, आहारतज्ञ मीही करतो आठवड्यातून एक उपवासउपवासामुळे शरीराला एक प्रकारचा आरामच दिला जातो. त्यामुळे मी आठवड्यातून एक उपवास धरतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होते. - शैलेश पाटीलअनेकदा लोकांना जिम ट्रेनर कडून अत्यंत कठोर डाएट सांगितला जातो. यामुळे सुरुवातीचे काही महिने तो डाएट व्यवस्थितरीत्या पाळला जातो. यानंतर कंटाळून तो डायरेक्ट सोडला जातो. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा उपवास केल्यास त्यात सातत्य राहते.- विनिता केणी