शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

२४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येणं धोकादायक; पावसाळ्यात करू नका दुर्लक्ष, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 3:51 PM

कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

पावसाळ्यात कधी पाऊस तर कधी ऊन असे हवामानात सतत बदल होत असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अनेक आजार झपाट्याने पसरत आहेत. याच दरम्यान अनेकांना हमखास ताप येतो. मात्र हा ताप काही दिवसांनी जातो. तुम्ही त्यातून बरे होता. पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे ही चूक करू नका. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप येत असल्यास सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण, हा ताप अनेक आजारांचं लक्षण असू शकतो. तापाद्वारे शरीर संसर्गाशी लढतं, परंतु जर ते दीर्घकाळ टिकत असेल तर याचा अर्थ संसर्ग गंभीर होऊ लागला आहे आणि इतर समस्यांचा धोका आहे. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळ टिकणारा ताप शरीराच्या अनेक अवयवांना इजा करू शकतो.

पावसाळ्यात ताप येऊ नये म्हणून हे करा

1. नियमितपणे हात धुवा आणि स्वच्छता राखा.2. संक्रमित लोकांपासून स्वतःचं रक्षण करा.3. फक्त पौष्टिक अन्न खा आणि भरपूर पाणी प्या.4. व्यायाम आणि चांगली झोप घ्या.

पावसाळ्यात २४ तासांपेक्षा जास्त ताप राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. याशिवाय तापासोबत डोकेदुखी, उलट्या, जुलाब किंवा धाप लागणे, अंगावर लाल पुरळ उठणे, बेशुद्ध पडणे असा त्रास होत असेल तर रुग्णालयात जा. जेणेकरून आजारावर योग्य वेळी उपचार करता येतील. यामध्ये थोडासा निष्काळजीपणाही परिस्थिती गंभीर बनवू शकतो.

दरवर्षी या ऋतूत डेंग्यूने कहर केला आहे, मात्र यंदा डेंग्यूशिवाय इतरही अनेक व्हायरस लोकांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. निपाह व्हायरस असो, चांदीपुरा व्हायरस असो, झिका व्हायरस असो किंवा व्हायरल फ्लू, प्रत्येकाचं पहिलं लक्षण म्हणजे ताप. अशा स्थितीत जर ताप २४ तासांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर त्याला हलक्यात घेण्याची चूक करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शक्य तितक्या लवकर रोगाचे निदान करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.

कसं राहायचं सुरक्षित?

तापासह संसर्गाचे परिणाम कमी करणे सर्वात महत्वाचे आहे. यावेळी, डिहायड्रेशनपासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकं पाणी प्या. विशेषतः उष्णता असल्यास स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. याशिवाय, जर तुम्हाला ताप, उलट्या, जुलाब असं काही होत असेल तर जास्तीत जास्त विश्रांती घ्या कारण विश्रांतीमुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत होते. याशिवाय पावसाळ्यात भिजल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे ताप येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ करू नका, गरम पाण्यानेच अंघोळ करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य