शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

बापरे! जास्त पाणी प्याल तर कोमात जाल, तज्ज्ञांचा सल्ला; 24 तासांत इतकंच प्या, दिसतात हे 7 संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 4:45 PM

उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

आपल्या शरीराचा एक मोठा भाग फक्त पाण्याने व्यापलेला असतो. हे डिहायड्रेशनपासून संरक्षण आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. म्हणूनच उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

हेल्थ कोच आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे हे सांगितले. जेणेकरून त्याचे कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील. तहान कशी लागते आणि जास्त पाणी पिण्याची सवय किती घातक ठरू शकते ते जाणून घेऊया.

डॉ. प्रियंका यांनी सांगितले की मेंदूमध्ये एक थ्रस्ट सेंटर आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा विशिष्ट पेप्टाइड्स स्राव होतात. जे थ्रस्ट सेंटरला सिग्नल देतात की शरीराला पाण्याची गरज आहे आणि तुम्हाला तहान लागली आहे.

तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. डॉ. प्रियंका यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये व्यक्ती तहान न लागता दर 2-5 मिनिटांनी पाणी पिणे सुरू ठेवते. हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरातील द्रव पातळी जास्त होते.

Kidney.org (ref.) नुसार, जेव्हा शरीरात जास्त पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात, जी विशेषतः मेंदूसाठी हानिकारक आहे आणि कोमामध्ये पोहचवू शकते.

हायपोनेट्रेमियाची लक्षणे

- मळमळ किंवा उलट्या- डोकेदुखी किंवा थकवा- लो ब्लड प्रेशर- ऊर्जेचा अभाव- स्नायू कमकुवत - चिंता किंवा राग येणे- कोमा

प्रियांका शेरावत यांनी एका दिवसात किती पाणी लागते हे सांगितले. त्या म्हणाल्या की 24 तासांत 2 ते 3 लीटर पाणी पिणे पुरेसे आहे. तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य