शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 10:36 AM

सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने कडूलिंबाला फार महत्व आहे. कडूलिंबाची चव भलेही कडू असेल, पण याने आरोग्याला कितीतरी फायदे होतात. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाण्याचे फायदे

1) ब्लड शुगर कंट्रोल

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे भारतात सतत डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आजही बरेच लोक घरगुती उपायावर विश्वास ठेवतात. याच घरगुती उपयांपैकी एक म्हणजे सकाळी कडूलिंबाची पाने खाणे. असं केल्याने बल्ड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

2) रक्त शुद्ध होतं

कडूलिंबामध्ये असे औषधी गुण असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करतात. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जर रक्त शुद्ध राहिलं तर तुम्हाला कोणते आजारही होणार नाहीत. 

3) पोटासाठी फायदेशीर

कडूलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटोसाठीही फायदेशीर ठरतो. यातील काही गुणांमुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडून हे पाणी प्यायल्याने अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

4) इम्यूनिटी

कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे आपली इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर सर्दीसारखी समस्याही याने दूर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य