शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
2
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
3
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
6
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
7
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
8
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
9
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
10
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
11
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
12
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
13
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
14
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
15
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
16
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
17
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
18
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
19
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
20
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 4:50 PM

उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो. बर्‍याच वेळा लोकांना स्ट्रोक येतो, त्यामुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा तक्रारी दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे लहान असो वा मोठे... कोणालाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट कशी टाळायची हे जाणून घेण्याची गरज आहे. 

आहारात नारळ पाण्याचा समावेश करा

येत्या काही दिवसांत उष्ण वारे वाहू लागतील. थोडासा निष्काळजीपणा महागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा. मुले सहसा कमी पाणी पितात. नारळाच्या पाण्याने त्यांना फायदा होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

काकडी खावी

उष्णता टाळायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. हे टाळण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे शरीरात पाण्याचा पुरवठा होत राहतो. काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीत व्हिटॅमिन ए, बी, के आणि फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ते खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास मदत होते.

पाय पाण्यात बुडवून ठेवा

पायाचे तळवे खूप गरम होतात. त्यातून निघणारी उष्णता थेट डोक्यावर येते. हे टाळण्यासाठी तुमचे पाय बादलीत किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठेवा. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स