शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

आपला इण्टरव्ह्यू फसला, नोकरी गेली हातची हे कसं ओळखाल?

By admin | Published: May 31, 2017 4:23 PM

आपली पात्रता असते तरी नोकरी मिळत नाही, इण्टरव्ह्यू फसतो तेव्हा नक्की काय घडतं?

- पवित्रा कस्तुरेनोकरीच्या इण्ट्यरव्ह्यूला जाताना छातीत धडधडतंच. आपल्याकडे डिग््रया असतात, नॉलेज असतं, आपण पात्रही असतो, अनुभवही असतो. पण तरी आपल्याला हवी ती किंवा मिळेलच अशी खात्री असलेली चांगली नोकरी अनेकदा मिळत नाही. आपल्याला वाटतं की, आपला इण्टरह्यू तर चांगला झाला, खूप इम्प्रेस झाले मुलाखत घेणारे, पण मग तरी आपल्याला ती नोकरी का मिळाली नाही? असं अनेकदा झालं, वारंवार झालं की आपण निराश व्हायला लागतो. कळत नाही चुकतं काय? कुणाचं? आणि कशानं? पण त्यावरही उपाय आहे, आपली मुलाखत नक्की कशी झाली, हे आपलं आपणच समजून घ्यायचं. म्हणजे मग पुढच्या कॉलची वाट पाहत न बसता, पुढच्या मुलाखतीच्या उत्तम तयारीला आपण मोकळे.कसं ओळखा नोकरी गेली हातची की नाही ते?दोन मिण्टात बाहेर?तुम्ही आत जाता, मुलाखत घेणारा एखादाच प्रश्न विचारतो. तुम्ही उत्तरही तुमच्यामते अचूक देता. पण मग तो म्हणतो या आता. आम्ही कळवतो. तिथंच ओळखायचं की आपली शितावरुन भाताची परीक्षा झाली आहे, त्यांच्यालेखी आपण योग्य उमेदवार नाही. मुलाखत फारच कमीवेळ झाली की आपली विकेट गेली हे समजून घ्यायचं.तुमचं शिक्षण खूप जास्त आहे..असं आपली कागदपत्रं पाहून जर मुलाखत घेणारा म्हणाला तर समजा की, आपली दांडी गूल. काहीतरी कारण सांगायचं म्हणून तसं सांगतात किंवा खरंच एवढं जास्त शिक्षण असलेला उमेदवार त्यांना नको असतो त्या पदासाठी. मात्र काहीही झालं तरी अर्थ तोच, नकार.

तुम्ही अमूकतमूक का करत नाहीसमजा, प्रश्न विचारण्यापेक्षा मुलाखत घेणारा तुम्हाला सल्ले देवू लागला, हे करा-ते करा, अमूक का करत नाही तर समाजयचं की आपल्याला जा असं सांगता येत नाही म्हणून हे सारं चाललं आहे.तुम्ही फार टॅलेण्टेड आहातअसं कधी कधी मुलाखत घेणारे सांगतात, आपल्याला बरं वाटतं. पण तसं नसतं. त्यांना खरंतर सांगायचं असतं की तुम्ही ओव्हरस्मार्ट आहात, ही चालाखी इथं नाही चालायची. या आपण.मुलाखतीला उशीरम्हणजे अनेकदा होतं काय पहिल्या राऊण्डला सिलेक्शन होतं. पण पुढचा कॉलच येत नाही. मेलला उत्तर येत नाही. समजा आलाच एखादा कॉल तर रिसेप्शनवर बसवून ठेवतात. मुलाखतीला उशीर करतात. आणि मग थातूरमातूर कारण सांगून नकार देतात. असं का करतात? ते चूक की बरोबर हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा. मात्र त्यातून आपल्याला मेसेज एकच, नोकरी नाही.