शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

एक महिना साखर खाणं सोडलं तर किती कमी होईल वजन? जाणून घ्या काय होतात इतर फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:31 IST

Health Tips : तुम्ही जर सुरूवातीलाच एक महिना साखर खाणं बंद कराल तर त्यानं शरीरात काय बदल होतील? हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

Health Tips : लोक रोज वेगवेगळे गोड ड्रिंक पितात आणि वेगवेगळे गोड पदार्थ खातात. यात शुगर जास्त असल्यानं लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोगसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशात या आजारांचा धोका टाळण्यासाठी तुम्हाला आहारातून शुगर पूर्णपणे दूर करावी लागते का? तुम्ही जर सुरूवातीलाच एक महिना साखर खाणं बंद कराल तर त्यानं शरीरात काय बदल होतील? हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

कमी होईल वजन

एक महिना जर साखर खाणं पूर्णपणे सोडलं तर तुमचं वजन कमी होईल आणि एकंदर आरोग्यही खूप चांगलं होईल. एक्सपर्ट सांगतात की, आहारात अतिरिक्त शुगर दूर केल्यास २ ते ५ किलो वजन कमी करू शकता. हे तुमचं चयापचय, आहार आणि शारीरिक हालचालीवर अवलंबून असेल. साखरेमुळे कॅलरी अधिक वाढतात आणि पोटाच्या आजूबाजूला चरबीही जमा होते.

साखर सोडल्यावर शरीर कसं रिअॅक्ट होतं

साखर खाणं सोडल्यावर काही दिवसांच्या आतच तुम्हाला डोकेदुखी, मूड स्विंग आणि थकवा यांसारखी लक्षणं दिसू लागतात. मात्र, एक आठवड्यानंतर तुमच्या ऊर्जेचा स्तर स्थिर होतो आणि साखरेची किंवा गोड खाण्याची लालसा कमी होते. दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं पचन चांगलं होतं, त्वचा साफ दिसते आणि फोकसही चांगला होतो.

तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापर्यंत तुमचं शरीर ऊर्जेसाठी शरीरात जमा चरबी जाळणं सुरू करतं. ज्यामुळे वजन कमी होतं. साखर कमी खाल्ल्यानं सूजही कमी होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही टळतो आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. एक्सपर्ट साखरेऐवजी फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खाण्याचाही सल्ला देतात.

एकंदर काय तर एक महिना जर तुम्ही साखर खाणं सोडलं तर शरीरात भरपूर बदल बघायला मिळतील. पचनक्रिया मजबूत होईल, वजन कमी होईल, वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होईल. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही अनेक वर्ष निरोगी जीवन जगू शकाल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य