शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

आतड्या साफ करण्यासाठी बेस्ट आहेत या तीन भाज्या, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 16:12 IST

आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात.

शरीराची बाहेरील स्वच्छता नेहमीच केली जाते. पण तुम्हाला शरीर आतून कसं स्वच्छ करायचं हे माहीत आहे का? शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.

आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, भूक कमी लागणे, पाइल्स, अॅसिडिटी, वजन कमी होणे, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार अशा समस्या होतात. 

अशात आयुर्वेदिक डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, पोटातील आतड्यांमध्ये जमा असलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तीन भाज्या फार महत्वाच्या ठरतात. चला जाणून घेऊ त्या भाज्यांबाबत...

आतड्या स्वच्छ करण्यासाठी पांढरा भोपळा

पांढरा भोपळा ही फार पौष्टिक आणि चविष्ट भाजी असते. ही भोपळ्याच्या प्रजातींमधील एक प्रजाती आहे. हिवाळ्यात ही भाजी भरपूर मिळते. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. याने आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते. वात आणि पित्त दोषही यामुळे कमी होतो.

शेवग्याच्या शेंगा

आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतरही आरोग्यासाठी फायदेशीर तत्व असतात. याच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजी खाऊ शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील.

आतड्यांची स्वच्छता करेल आलं

कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात चांगलं मानलं जातं. तसेच याने बद्धकोष्ठताही दूर होते. जुनी श्वास घेण्याची समस्या, अस्थमा, लठ्ठपणा, आतड्यांची स्वच्छता यात हे फार फायदेशीर असतं.

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये एक आल्याचा तुकडा बारीक करून टाकू शकता. डॉक्टरांनी सांगितलं की, हे केल्यावर तुम्हाला 10 दिवसात फरक दिसून येईल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य