शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
3
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
4
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
5
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
6
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:01 AM

Mistakes While Drinking Water : हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

Mistakes While Drinking Water : पाण्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाणी नाही मिळालं तर काय होतं यावरूनच हे कळतं. इतकंच नाही तर आपल्या शरीरातही 75 टक्के पाणी असतं. पाण्याशिवाय आपलं जीवन जगणं अशक्य आहे. हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. डॉक्टरांचा सल्ला असतो की, तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवं. कारण शरीरात पाण्याची कमी झाली तर सेल्सना योग्यपणे ऑक्सिजन मिळत नाही. पण पाणी पिताना तुम्हाला हेही माहीत असायला हवं की, पाणी पिताना तुम्ही कही चुका तर करत नाही ना? कारण पाणी पिताना काही चुका केल्या तर तुम्हाला समस्याही होऊ शकतात. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो.पाणी पिताना केल्या जाणाऱ्या चुका

1) प्लास्टिक बॉटलमधून पिऊ नका पाणी

आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. लोक पाणी पिण्यासाठी जास्तीत जास्त प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, प्लास्टिकची बॉटल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. एका रिसर्चनुसार, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. याने प्लास्टिकचा कचरा पाण्याती मिक्स होतो आणि हेच मायक्रोप्लास्टिक रक्तात पोल्यूशन पसरवतं. यानेच पाणी पिण्याचा मार्ग म्हणजे गळ्याचे अवयव खराब होतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

2) किती पाणी प्यावं?

जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर याने तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. जास्त गरमी असेल तेव्हा भरपूर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झालं तर चक्कर येतात. एक्सपर्ट्स सांगतात की, वयस्क व्यक्तीने शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्यावं.

3) पाणी कसं प्यावं?

जास्तीत जास्त लोक पाणी पिताना काही चुका करतात. जसे की, फ्रीजमध्ये ठेवली बॉटल काढून लगेच पाणी पिणे. सोबतच काही लोक एकाचवेळी भरपूर पाणी पितात. इतकंच नाही तर जेवणादरम्यान आणि जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जे चुकीचं आहे. हाय मिनरल्स असलेलं पाणी पिणं टाळलं पाहिजे. या सगळ्या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. उभं राहून पाणी पिऊ नका. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं. 

4) कधी पाणी पिणे फायदेशीर

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

5) असं अजिबात करू नका

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य