शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

ती पुन्हा सावरली त्याची गोष्ट..! स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची लक्षणं कशी ओळखायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:01 IST

आयुष्यात आकस्मिक आघात होत असतात. अशा परिस्थितीत न डगमगता समोर उभे ठाकलेले आव्हान स्वीकारावे लागते; पण त्यातून सावरण्याची शक्ती आपल्यात निर्माण होऊ शकते, याची खात्री असायला हवी.

डॉ. विद्याधर बापट मानसोपचार तज्ज्ञ

आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने पदरी दोन मुले असलेल्या श्वेतावर आकाश कोसळले. तिच्या आणि आदित्यच्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी तिला भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसने नियमाप्रमाणे श्वेताला नोकरीही दिली; मात्र श्वेता खचून गेली होती.  श्वेताला महिनाभरात आदित्यच्या ऑफिसमध्ये रुजू व्हायचे होते. धीर एकवटून ती दु:खातून सावरू पाहत होती. तिने आदित्यच्या ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात केली. मात्र, मुख्य अडचण तर पुढेच होती. तिला ऑफिसच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईना. ऑफिसची इमारत दिसली तरी श्वेता अस्वस्थ व्हायला लागली. दिवसभर ती कशीबशी ऑफिसमध्ये थांबायची. काम शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायची. साहेबांनी बोलावले तरी तिला दडपण यायचे. कामात लक्ष लागायचे नाही. 

सुरुवातीला नवीन असल्याने होत असेल असे म्हणून तिला सगळ्यांनी समजावले. कसेबसे दोन महिने गेले आणि श्वेताला शारीरिक-मानसिक अस्वस्थता विलक्षण वाढल्याचे लक्षात आले. ऑफिसला गेले की मळमळायला लागणे, डोकेदुखी वाढणे, हातपाय थरथर कापणे, असे त्रास होऊ लागले. सर्व शारीरिक तपासण्या केल्या; मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आदित्यच्या अकाली जाण्याने नैराश्याबरोबरच ॲडजेस्टमेंट डिसऑर्डर किंवा स्ट्रेस रिस्पॉन्स सिण्ड्रोमची ही लक्षणे होती.  ॲडजेस्टमेंट डिसऑर्डरची लक्षणे घटना घडून गेल्यानंतर किंवा विपरित स्थिती निर्माण झाल्यावर साधारणत: तीन-चार महिन्यांत दिसू लागतात. ही लक्षणे आठ-दहा महिन्यांपर्यंत टिकतात. परिस्थिती बदलली किंवा उपचारांमुळे लक्षणे हळूहळू नाहीशी होतात. 

लक्षणे काय ? 

अस्वस्थता, चिडचिडेपणा, निराश वाटणं, असाहाय्य वाटणे, मधूनच रडू येणे, सतत पूर्वीची त्रास नसतानाची स्थिती आठवत राहणे, लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ऑफिस/शाळा/कॉलेजला जाणे टाळणे, छातीत धडधडणे, घाम येणे, हात थरथरणे, अपचन तसेच डोकं दुखणे. 

उपचार काय?

डायलेक्टिकल बिहेव्हियर थेरपी : ही थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हरल थेरपी (सीबीटी) या दोन्ही पद्धतींमध्ये तुमचे विचार, भावना आणि वर्तन व त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम तपासला जातो. 

विशेषतः, चुकीची विचार करण्याची पद्धत ही अंतिमतः वागणुकीवर, तिच्या विपरीत परिणामांवर आणि मन:स्वास्थ्यावर कशी परिणाम करते, हे लक्षात आणून दिले जाते. वेगवेगळ्या युक्त्या वापरून विचार, भावना आणि वर्तन सुधारण्याची कौशल्ये शिकवली जातात.  विपरीत किंवा बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवले जाते. घडलेल्या घटनेचा विनाअट स्वीकार करायला शिकवले जाते. मग मन:स्वास्थ्य सुधारायला लागते. आज श्वेता नोकरीत छान स्थिरावली आहे. तिने दु:ख स्वीकारायची, त्याच्याकडे साक्षीभावाने पाहायची आणि नव्याने आव्हान पेलण्याची शक्ती स्वत:मध्ये निर्माण केली आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स