शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नर्व्हस झालात, अस्वस्थ वाटायला लागलं तर करून पाहा हे सोप्पे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:31 PM

थोड्याच वेळात तुमचा मूड होईल नॉर्मल!

ठळक मुद्देतुम्हाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलं आहे, हे मान्य करा आणि सामोरं जा त्याला.या भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. ही स्थिती क्षणैक आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा.. थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल.ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला, चालायला जा. आपल्या आवडीचं दुसरं काही तरी काम करा.

- मयूर पठाडेअनेकदा कुठल्यातरी चिंतेनं आपल्याला घेरलं जातं. अचानक अस्वस्थ वाटायला लागतं, मनातू कसली तरी भीती दाटून येते. अस्वस्थ वाटायला लागतं, नर्व्हसनेस वाढतो, अनइझी व्हायला लागतं.. काय करायचं अशावेळी?अर्थातच डॉक्टरांची मदत घेणं हा तर त्यावर सर्वोत्तम उपाय आहेच, पण बºयाचदा आपल्या या चिंतेला आपण स्वत:च आपल्यापासून दूर करू शकतो. या चिंता जशा अचानक आपल्याला घेरतात, तशाच काही मिनिटांमध्ये या अनामिक चितांना आपण पळवूनही लावू शकतो.तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलं आहे, हे नाकारु नका. काहीतरी आपल्याला त्रास देतंय, हे तर खरंय, मान्य करा ते आणि सामोरं जा त्याला. या भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. या भावनेशी युद्ध छेडाल, तर आणखीच त्रास होईल. त्यापेक्षा थोडा वेळ शांत बसा. स्वत:शीच संवाद साधा. ही स्थिती क्षणैक आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा.. बघा खरोखरच थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल. अर्थातच लक्षात ठेवा, ही अस्वस्थता कशामुळे आहे, हे आपल्याला बºयाचदा स्वत:चं स्वत:लाच कळतं. हे कारण काही तरी फुटकळ आहे की गंभीर, तेही बºयाचदा लक्षात येतं. तसं नाही आलं लक्षात, तर मग मात्र डॉक्टरी सल्ला केव्हाही श्रेयस्कर.तणावावर, चिंतेवर मात करण्याचा आणखी एक उत्तम उपाय म्हणजे ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला, चालायला जा. दुसरं काही तरी काम करा. काहीतरी गंमतीशीर वाचा, पाहा. मोबाइलमधले फनी व्हीडीओज थोडा वेळ पाहा. ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, असं काहीतरी करा. तणाव निर्माण करणाºया त्या परिस्थितीतून स्वत:ला पूर्णपणे बाहेर काढा. थोड्याच वेळात तुमचा मूड नॉर्मल होईल..