शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग 'या' गोष्टी खाणं टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 3:46 PM

पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

पावसाळ्यातलं धुंद वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र याच वातावरणात अनेकदा आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो. खाण्याच्या काही चुकीच्या सवयी या आजारपणाला आमंत्रण देत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात निरोगी राहायचंय असेल तर खाण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया. 

- पावसाळ्यात अनेकदा वाफाळलेल्या चहासोबत भजीचा बेत आखला जातो. मात्र मोकळ्या वातावरणात उघड्यावर तळले गेलेले अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा. कारण हवेतील जंतू हे त्या पदार्थावर बसतात त्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याचा धोका संभवतो. 

- हिरव्या पालेभाज्या या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. तसेच डॉक्टरही त्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र पावसाळ्यात शेतात किडे-जंतू असतात. ते पालेभाज्यांना चिकटतात. त्यामुळेच अशा भाज्यांचं सेवन शक्यतो टाळा.

- बाजारात उघड्यावर विकले जाणाऱे सरबत पिणं टाळा. बऱ्याचदा सरबत तयार करण्यासाठी वापरलेलं  पाणी अशुद्ध असते. त्यामुळे पावसाळ्यात घरी फळं आणून त्याचा रस पिणे फायदेशीर ठरेल. 

- पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे माशाचे सेवन करणं शक्यतो टाळा.

- पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाऊ नका. अनेकदा रात्रीचे अन्न वाया जाऊ नये यासाठी ते सकाळी खाल्ले जाते. मात्र पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे ते खराब होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :foodअन्नRainपाऊस