शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

Mango Benefits : आंबे खाण्यापूर्वी पाण्यात बुडवून ठेवणं आवश्यक आहे का? ही आहे खाण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 8:33 PM

अनेकवेळा मनात प्रश्न येतो की लोकं खाण्यापूर्वी आंबे पाण्यात का बुडवून ठेवतात? ही केवळ आपली आवड आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे?

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. उन्हाळ्यात आंबा खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आंबे खाण्यापूर्वी पाण्यात टाकावेत हे आपण लहानपणापासून पाहत आणि ऐकत आलो आहोत. आंबा खाण्यापूर्वी १-२ तास पाण्यात ठेवला जातो. आंबे पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातील उष्णता कमी होते असं म्हटलं जातं.

आंब्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात जीवनसत्त्वे A, C, B6, फायबर, फोलेट, कॉपर, कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स असतात. याशिवाय हे फॅट फ्री, सोडियम फ्री आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे.

आंबे पाण्यात का ठेवतात?आंबे पाण्यात भिजवण्याचा मंत्र फार जुना आहे. असं केल्यानं अतिरिक्त फायटिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत होते. हे शरीरात उष्णता निर्माण होते. टरबूज, आंबा आणि पपई ही फळे शरीरात उष्णता निर्माण करतात, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. त्याच्या अति उष्णतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे डायरिया आणि स्किन इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी फळे पाण्यात भिजवल्याने नैसर्गिक उष्णता (प्रभाव) कमी होतो. अशा परिस्थितीत त्यांचं सेवन शरीरासाठी सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात बुडवून ठेवावे. जर हे शक्य नसेल तर किमान २५-३० मिनिटं तरी आंबे पाण्यात ठेवावे असं म्हटलं जातं.

आंबा खाण्याची योग्य पद्धतआंबा खाण्याचा उत्तम उपाय म्हणजे तो कापून खाणे. पण काहींना आमरसही आवडतो. आयुर्वेदानुसार आंबा आणि अन्य फळांसह एकत्र कधीही खाऊ नयेत. आंबा, एवोकॅडो, खजूर इत्यादी गोड, पूर्ण पिकलेल्या फळांसोबतच दूध घ्यावं. जेव्हा तुम्ही पिकलेला आंबा दुधात मिसळून खाता तेव्हा ते वात आणि पित्त शांत करते. ते चवदार असण्यासोबतच पौष्टिक देखील आहे. अशा परिस्थितीत आता या कडक उन्हात मँगोशेकचा आस्वादही घेऊ शकता.

टॅग्स :MangoआंबाHealthआरोग्य