शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Raju Srivastav Death: राजू श्रीवास्तव यांचा कार्डियाक अरेस्टने गेला जीव, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 12:15 IST

Raju Srivastav Death Reason : गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 41 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्येच होते.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं आज 58 वयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ते बरे होण्याची अपेक्षा होती, पण आज सकाळी अचानक त्यांचं निधन झालं. गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 41 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्येच होते.

राजू श्रीवास्तव हे हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर एक्सरसाइज करताना त्यांच्या छातीत दुखलं आणि ते खाली पडले. यानंतर राजू यांना जिम ट्रेनरने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं की, एक्सरसाइज करताना राजू श्रीवास्तव यांना कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest symptoms) आला होता. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक केके यांचंही कार्डियाक अरेस्टमुळेच निधन झालं होतं. 

अलिकडे कमी वयातच लोकांना कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका वाढला आहे. कार्डियाक अरेस्टच्या लक्षणांना लोक सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. जे घातक ठरू शकतं. कार्डियाक अरेस्ट काय आहे? कार्डियाक अरेस्टची लक्षणे काय आहेत? 

काय असतो कार्डियाक अरेस्ट?

अनेक लोकांना वाटतं की, कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकचं एक रूप आहे. पण असं अजिबात नाहीये. कार्डियाक अरेस्ट हा हृदयातील आतील भागात काही बिघाड झाल्याने येतो. म्हणजे हृदयाचं काम आहे रक्त शुद्ध करणं आणि शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा करणं. जर यात काही बिघाड झाला तर समस्या होते. याचा थेट प्रभाव हृदयाच्या गतीवर पडतो. ज्या लोकांना आधीच हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्यांना कार्डियाक अरेस्ट येण्याची जास्त शक्यता आहे.

कार्डियाक अरेस्टची लक्षणे

हृदयाची धडधड वेगाने होते

छातीत वेदना होणे

चक्कर येणे

श्वास घेण्यास समस्या होणे

लवकर थकवा जाणवणे

अचानक कसा येतो कार्डियाक अरेस्ट?

कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणं बंद करतं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि बेशुद्ध झाल्यासारखं वाटू लागतं. हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये गडबड होऊ लागते. ज्यामुळे ही स्थिती बनते. यामुळे हृदयाची पंपिंग क्रिया विस्कळीत होते आणि शरीरातील ब्लड फ्लो थांबतो.

हार्ट अटॅक काय असतो?

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे हार्ट अटॅकमुळे मृत्यूदर वेगाने वाढत आहे. ज्यामुळे अनेक लोक आपली लाइफस्टाईल चांगली करण्याच्या मागे लागले आहेत. पण जेव्हा कार्डियाक अरेस्टचा विषय येतो तेव्हा हार्ट अटॅकची शंका चिंता वाढवते. हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयाच्या काही भागांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. पण कार्डियाक अरेस्टमध्ये रक्तप्रवाह अचानक बंद होतो. हार्ट अटॅक नंतरही शरीरातील काही भागांमध्ये रक्तप्रवाह सुरू असतो. पण कार्डियाक अरेस्टच्या स्थितीत रक्तप्रवाह शरीरात पूर्णपणे बंद होतो.

टॅग्स :Raju Shrivastavराजू श्रीवास्तवHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य