शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

त्वचारोगावर संशोधनात्मक वनस्पती

By admin | Published: September 15, 2015 6:47 PM

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.
पांढरे कोड (कोड) - विरुद्ध पदार्थांचे सेवन, मद्य, मास, दही, आम्ल, उडीद, अति संताप, पावबटर, अनुवांशिकता, फास्ट फूड, वातादि दोष कुपीत होऊन रक्त, मास व उदक यांना दूषित करून कोडास उत्पन्न करतात. हल्लीच्या काळात गायीच्या दुधाच्या अभावाने कोडाचे प्रमाण वाढत आहे. अनुवांशिकतेने झालेले कोड कष्ट साध्य समजावे.
खैराची अंतरसाल, त्रिफळा, पडवळ, गुळवेल, बातची, शुद्ध गंधर्व, मनशिल, हरमाळ, हळद, टाकळ्यांचे बी, जिरे, अल्प कडुजिरे, पांढरी गोकर्णी, पिंपळी, जाई, हिराकस, वावडिंग, गोरोचन, सैंधव, कावळी, टाकळ्यांचे बी कोष्ट, मुळ्याचे बी, शुद्ध निवडुंग, चित्रक शुद्ध, नागरमोथा, समुद्रफेस, कुटकी, बाहता, करंज, काजळी, कपीला, चंडन, तरतडाचे बी, पांढरी गोकर्णी, रिंगणीची फळे, तेखंड, लोहभाग, पोरतमुळ, जटामासी, काळा माका, चिकणा इत्यादी गोमूत्रात किंवा दुधात घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रमाण व काही वनस्पतीची शुद्धी करणे आवश्यक आहे. पांढरे कोड या आजाराची काही कारणे अज्ञात आहेत. यापासून शरीरास अपाय नाही किंवा स्पर्शसंचारही नाही. लोक याला समजतात तेवढा हा भयंकर नाही. फक्त दिसायला त्वचा विरुप दिसते. यापेक्षा या विकारात त्रास नाही. हा विकार दोन प्रकारात दिसतो. एकात त्वचा पांढरी व दुसर्‍यात त्वचा लालसर असते. या विकाराचा आरंभ ओठ, कंबर, डोळ्यांच्या पापण्या, हात-पायाला एखादा वाटोळा डाग येतो. डाग असलेल्या जागेवरचे केस पांढरे होऊन गळू लागतात. तेव्हा हा कष्टसाध्य होतो. दहा-पाच ठिकाणी लहान-मोठे डाग लवकर बरे होतात. ओठावरील व तळहातावरील डाग लवकर जात नाहीत. समाजाने या रोगाविषयी भलताच गैरसमज करून घेऊ नये व रुग्णानेसुद्धा मनात न्यूनगंड बाळगू नये. कारण हा आजार नसून लक्षण आहे. त्याचे इतरांना व आपणास काही दुष्परिणाम होत नाही. तेलकट, तिखट, आंबट विरुद्ध अन्न (केळाचे शिकरण, मध, तूप, दही, लसूण एकत्र करणे.) तसेच मांस, अंडी इत्यादी पदार्थ न खाता वरील औषधाची मात्रा घेतल्याने हा विकार बरा जरी झाला नाही तरी वाढणार नाही असे मला वाटते.