शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:23 PM

Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स!

मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार या आजारांच्या बरोबरीने घरातघरात थैमान घालत असलेला आणखी एक आजार म्हणजे कर्करोग! पूर्वीच्या काळातही कर्करोगाचे रुग्ण हाते, परंतु त्यांच्या संख्या शंभरात दोन किंवा तीन इतकी असे. आता हे प्रमाण उलट होऊन शंभरात दोन ते तीन जण निरोगी आढळतात. एकाएक हे गुणोत्तर व्यस्त होण्याचे कारण आहे, बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती! 

उदाहरणार्थ, प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात. परंतु त्या विखरलेल्या असतात. त्या एकत्र आल्या की त्यांची टोळी मोठा घातपात करते. त्या एकट्या दुकट्याने असतात, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्या एकत्र आल्यावर त्या घालवण्यासाठी आपण पाण्यासारखा पैसा घालतो. कर्करोगाच्या पेशी वाढतात, कारण त्यांना गरजेपेक्षा जास्त अन्न पुरवले जात आहे. आता तर परदेशातील शास्त्रज्ञही सांगत आहेत, की रोज अधून मधून उपास करा. दोन जेवणांमध्ये सोळा तासांचे अंतर ठेवा. परंतु हजारो वर्षांपासून आपल्याकडे हेच सांगितले जाते. मात्र, आपण ती आहारपद्धती न अनुसरता कधीही, कितीही, कसेही खाऊन रोगांना आमंत्रण देतो. 

सद्गुरुंच्या सांगण्यानुसार दिवसातून दोन वेळा जेवण पुरेसे आहे. तेही सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता. दिवसभरातून एकदाच जेवलात, तर तेवढेही जेवण पुरेसे आहे. ऊर्जानिमित्ती हा अन्नसेवाचा हेतू आहे. परंतु, जेवणानंतर तुम्हाला झोप येत असेल, तर ते अन्न तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

भूकेने कळवळणे आणि उपाशी राहणे, या दोन भिन्न स्थिती आहेत. भूकेने कळवळणारी व्यक्ती रागराग, चिडचिड करते. तर आपणहून उपाशी राहणारी व्यक्ती शरीर हलके झाल्याचे अनुभवते. शरीर हलके ठेवले, तर कामात लक्ष लागते. कामात गुंतून राहिल्यामुळे वारंवार खाण्याची सवय मोडते. जेवायच्या वेळी जेवण हे कर्तव्यासारखे पार न पाडता, भूक लागली की जेवणे इष्ट ठरते. अतिरिक्त जेवण अनावश्यक पेशींना खतपाणी घालते. उपाशी पोटी झोप लागत नाही, ही चुकीची मानसिकता आहे. आपणच हे मनाशी ठरवून टाकले आहे, की झोप लागणार नाही. न जेवताही दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेता आली पाहिजे. 

आहारपद्धतीत आणखी एक चांगली सवय म्हणजे जेवणाआधी अन्नाला स्पर्श करा. अन्न कसे आहे, ते जाणून घ्या. कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते नाही, हे तुम्हाला स्पर्शाने जाणवले पाहिजे. जे पदार्थ नको, ते उष्टे करण्याआधीच परत करा. अन्नाची नासाडी करू नका. शक्यतो हाताने जेवा. कारण हाताच्या स्वच्छतेची काळजी तुम्ही घेऊ शकता. चमचे स्वच्छ असतील, याची खात्री नाही. 

ग्रहण करत असलेल्या अन्नाकडे कृतज्ञतेने पाहिले पाहिजे. अन्न केवळ पदार्थ नाही, तर तुमचे जीवन आहे. अनेकांना ते मिळत नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. जाणीवेचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. सवय म्हणजे जागरुकपणे काम करण़े  मनुष्य म्हणून जगण्याची सुंदरता यात आहे, की आपण प्रत्येक काम जागरुकतेपणे करू लागतो. जे लोक जागरुकतेने काम करतात त्यांचे तेज दिसून येते. 

अन्नाबद्दल सूज्ञपणा कमी होत चालला आहे. केवळ जीभेला बरे वाटत आहे म्हणून न खाता शरीराला आवश्यक घटक कसे मिळतील, याचा बारकाईने विचार केला पहिजे. आपल्या आहारशैलीवर आपली दैनंदिन झोप अवलंबून असते. चांगल्या झोपेसाठी योग्य आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. मग कर्करोगच काय, अन्य कोणतेही रोग जवळही फिरकणार नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्न