त्वचा प्रत्यारोपणाने युवकाचा वाचला जीव (बातमी जोड)
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
बॉक्स...
बॉक्स...-त्वचादानाने मृत्यूची टक्केवारी कमी करता येऊ शकते देशात दरवर्षी ७४ लाख जळालेले रुग्ण आढळून येतात. यात सुमारे ४० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. त्वचादानाने या मृत्यूची टक्केवारी कमी करता येऊ शकते. एका रुग्णाला वाचविण्यासाठी दोन व्यक्तीच्या त्वचेची गरज भासते. त्यानुसार वर्षभरात जळालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी दीड कोटी व्यक्तीचे त्वचा दान होणे आवश्यक आहे. मृत्यूनंतर पहिल्या सहा तासात त्वचा दान करणे महत्त्वाचे असते. एचआयव्ही, गंभीर प्रकरचा कॅन्सर, हॅपेटायटिस, सेप्टीसिमीया व त्वचा रुग्णांची त्वचा घेतली जात नाही. -डॉ. समीर जागीरदार